शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 7:56 AM

मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, अशी टीका करण्यात आली आहे.

Thackeray Group Vs Modi Govt: मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरयाणात महिलांची उंची वाढली आहे. अलीकडच्या काळात आपल्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे. धनखड बोलत असताना त्या मंचावर गृहमंत्री अमित शहा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनहर खट्टर वगैरे तालेवार मंडळी उपस्थित होती. यावरून ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

हिंदुत्व हे आता धर्मांधता व बुरसटलेल्या विचारांकडे ढकलले जात असेल तर ते सगळ्यात धोकादायक आहे. कोविडची ‘लस’ मोदींनी बनवली, हरयाणातील मुलींची उंची मोदी सत्तेत आल्यामुळे वाढली अशा प्रकारचे ‘बोल’ हे मेंदूचा ताबा अंधश्रद्धा व अंधभक्तीने घेतल्याचा परिणाम आहे. जेव्हा विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. 

विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भारतीय जनता पक्षाची चूल पेटते आहे

भारतीय जनता पक्षाने ‘अंधभक्त’ नावाची एक मानवी जमात नव्याने निर्माण केली आहे. त्यांचा विज्ञान, संशोधन, आधुनिकता वगैरेंशी काहीच संबंध नाही. मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. मध्य प्रदेशातील एक बाबा धीरेंद्र शास्त्री की कोणी हा भाजपच्या प्रचाराचा झेंडा घेऊन फिरतो आहे. या बाबाची वक्तव्येही अशीच जुनाट वळणाची. हेच जर तुमचे हिंदुत्व असेल तर ते तुमचे तुम्हालाच लखलाभ ठरो. मोदी युगात अशा बुवाबाजीस महत्त्व मिळाले. कारण अशा विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भारतीय जनता पक्षाची चूल पेटते आहे, अशी टीका करण्यात आली आहे. 

मोदी युगात बेरोजगारी, महागाई वाढली

मोदी युगात बेरोजगारी, महागाई वाढली. प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याच्या त्यांच्या घोषणा हवेत विरल्या. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, आरोग्य, शिक्षण महागले. मणिपुरात हिंसाचाराची आग भडकली आहे. त्या आगीवर शांततेचे पाणी ओतण्याची उंची मोदी सरकारने का गाठू नये? मोदी युगात भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने टोकाची उंची गाठली. महिलांच्या उंचीपेक्षा या भ्रष्टाचाराची उंची दाहक आहे. चीन लडाखच्या सीमा पार करून आमच्या हद्दीत घुसला, पण एक इंच जमिनीवरही पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा अद्यापि आपल्या राज्यकर्त्यांनी ठामपणे घेतल्याचे दिसत नाही. भारताला तोडण्याचे आसुरी शक्तींचे प्रयत्न आहेत असा हल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला, पण या देशात भागवत वगैरेंच्या विचारांचे वारस असलेले सरकार व पंतप्रधान आहेत. मोदी यांची ख्याती विश्वाचे नेते अशी आहे, पण कोविडवरील लस पंतप्रधान मोदी यांनी शोधून काढली असे भाजपचे नेते सांगतात व अंधभक्त त्यावर टाळ्या वाजवतात. हा त्यांचा नवीन धर्म, असा घणाघात करण्यात आला आहे. 

दरम्यान, गाय ही माता नसून एक उपयुक्त पशू आहे हा वीर सावरकरांचा विचार. मोदी युगात वीर सावरकरांचा हा विज्ञानवादी विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत, पण त्यांना वीर सावरकरांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करायचा आहे. मोदी युगात देशाच्या जनतेची प्रतिष्ठा, मानवी हक्क, संविधान, लोकशाहीची उंची किती वाढली याचे मोजमाप होणे खरे म्हणजे गरजेचे आहे. हिंदू धर्म हा संकुचित नाही, पण मोदी युगात हिंदुत्व कमालीचे संकुचित व भयग्रस्त झाल्याचे दिसत आहे. खरे तर हिंदू धर्म हा एकमेव धर्म असा आहे की, जो विज्ञानाशी सुसंगत दिसतो. हिंदू धर्म हा विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मवाद यांचा मिलाफ आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरCentral Governmentकेंद्र सरकार