शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आघाडीच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 20:58 IST

पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

परभणी - पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच आडीमध्ये 56 पक्ष एकत्र आले आहे. मात्र 56 पक्षच काय 56 पिढ्या जरी खाली उतरल्या तरी परभणीवरील भगवा खाली उतरणार नाही, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा आज परभणी येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या शरद पवार यांच्या विधानांचा जोरदार समाचार घेतला. ''आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादीने शेण घोटाळा केला होता. पाच वर्षांपूर्वी यांनी केलेल्या घोटाळ्यांवर मी एक पुस्तकच प्रकाशित केले होते. लोकं विसरली असतील. पण या आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे वर्णन करायला. बाराखडीही कमी पडेल,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवार बोलतात की उद्धव ठाकरे वारा येईल तशी दिशा बदलतात. याच वाऱ्यामुळे माझा भगवा ध्वज डौलाने फडकत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवरही उद्धव ठाकरे बरसले. ''राहुल गांधी सावरकरांना डरपोक बोलतात. म्हणून राहुल गांधींना सांगतोय की हा हिंदुस्तान आहे हा इटली नाही आहे.  राहुल गांधी आयुष्यात कधी पंतप्रधान होणार नाही. काँग्रेस जर क्रांतिकारकांना देशद्रोही बोलतोय. अशा कपाळकरंटकाना हा देश देऊ नका, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. ''शेतकऱ्यांसाठीच्या जाचक अटी याचा पाठपुरावा करून त्या शिवसेनेने काढून टाकल्या आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.  गेली पाच वर्षे माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांना मदत करतोय आणि तेव्हा राष्ट्रवादीवाले घराच्या आत दरवाजा लावून  बसले होते., असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेparbhani-pcपरभणीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक