शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:57 IST

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले.

मुंबई - ही तुमची सत्तेमुळे फडफड सुरू आहे. जेव्हा सत्ता जाईल तेव्हा कळेल. एक दिवस तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावेच लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावे लागेल असं सांगत खासदार संजय राऊत यांनी रामदास कदमांवर घणाघात केला आहे. रामदास कदमांनीउद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली होती. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, आमच्यासारखे लोक पक्षासोबत इमानइतबारे राहिले आहेत त्यांच्याकडे बळ आहे, दिल्लीच्या मोगलांशी हातमिळवणी करून जे महाराष्ट्राचा विध्वंस करणाऱ्या शक्ती आहेत त्यांना रोखण्याची, संपवण्याची ताकद उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला परमेश्वराने दिली आहे. हे तुमचे फडफडणं तात्पुरते आहे. सत्ता आहे म्हणून फडफडणं आहे. एक दिवस तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावे लागेल. शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावे लागेल हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे असा टोला त्यांनी रामदास कदमांना लगावला. 

तर राजकारणात पैशाचा जोर वाढलेला आहे. ज्याप्रकारे निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत त्यातून याला बूच लावण्याचं काम सुरू आहे. भ्रष्टाचाराचा पैसा आमदार, नगरसेवक खरेदी विक्रीत वापरला जातोय, त्याला आवर घालण्याचं काम फडणवीस करतायेत. त्यामुळे जे पैशाच्या अपेक्षेने गेले आहेत त्यांना मधल्या मध्ये लटकत राहावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले.

काय म्हणाले होते रामदास कदम?

दरम्यान, फक्त कोकणातूनच नव्हे तर राज्यभरातून अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतायेत. कोकणात ठाकरेंचा एक आमदार निवडून आलाय. बाकी कोकणातून त्यांची जागा आली नाही. कोकणातून पूर्णपणे उद्धव ठाकरेंना हद्दपार केलेले आहे. भविष्यात महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे हद्दपार होतील. गंगेत अनेक लोकांनी डुबक्या मारल्या त्या सर्वांनीच पाप केले होते का, ज्यांना कावीळ असते त्यांना जग पिवळं दिसतं. सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना केवळ एकनाथ शिंदेंच दिसतात, ठाकरेंकडे हम दो, हमारे तीन इतकेच शिल्लक राहतील असं रामदास कदमांनी म्हटलं होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस