शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"उद्धव ठाकरे आणि CM फडणवीसांची छुपी रणनीती, लवकरच..."; भाजपच्या मित्रपक्षाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:53 IST

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व स्विकारलं असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

Ravi Rana on Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विधानसभेला ठाकरे गटाला केवळ २० जागा मिळवता आल्या. यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा राजकारणात सुरु झाली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छुपी रणनीती आहे असा दावा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारलं आहे आणि आता ते पंतप्रधान मोदींचेही नेतृत्व स्वीकारतील असंही रवी राणा म्हणाले.

विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरुनच ठाकरे भाजपच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जातोय. आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली होती. यावरुनच जोरदार चर्चा सुरु झाली. अशाताच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. तसेच संजय राऊतांना मोठा झटका बसणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

"संजय राऊतांना कल्पना नाही. ते अजूनही अंधारात आहेत. उद्धव ठाकरेंची मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्विकारलेलं आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदी यांचेही नेतृत्व ते स्विकारणार आहेत. त्या दृष्टीने त्यांचे पाऊल टाकणं सुरु आहे. म्हणून संजय राऊतांना असा झटका बसेल की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसतील," असा दावा रवी राणा यांनी केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने युवा स्वाभीमान पक्षाचे आमदार रवी राणा नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर रवी राणा यांनी मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांसमोर खंत व्यक्त केली. आमदार बनून बनून मी त्रासलो आहे, मला देखील वाटतं मी मंत्री झाले पाहिजे, अशी भावना रवी राणा यांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRavi Ranaरवी राणाSanjay Rautसंजय राऊत