शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

Uddhav Thackeray: 'मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये; माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 8:39 PM

'सत्ता गेल्याचे दुःख नाही; गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही.'

मालेगाव-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'आज आपलं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही, तरीदेखील एवढी गर्दी आली आहे. ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचा आशिर्वाद,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'तुम्ही जे प्रेम मला देत आहात, ते गद्दारांच्या नशिबी नाही. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये, मी तुमच्या प्रश्नासाठी लढतोय. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे. मी इथे आल्यानंतर शेतकऱ्यांना भेटलो, काय परिस्थिती आलीये शेतकऱ्यांवर. ज्यावेळेस आमचे सरकार होते, तेव्हा शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळायच्या. मी मुख्यमंत्री झालो आणि शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला. त्यानंतर अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, पण नंतर सत्तांतर झाले. आता शेतकऱ्यांच्या हाती काही येत नाही.' 

संबंधित बातमी- तुम्ही कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारुन घेतला; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

'आजचे मुख्यमंत्री स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणतात. ते हेलिकॉप्टरने शेतात जातात. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात, पण त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. कृषीमंत्री तर कधी दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, किती फटका बसला, हे काळोखात जाऊन बघतात. हे कृषीमंत्री महिलांना शिव्या देतात. सुप्रिया सुळेंना शिवी दिली आणि हे अजूनही पदावर बसले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ज्या तत्परतेने शेतकऱ्यांना मदत मिळायची, तेवढी आता मिळत नाही. माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय. सत्ता गेल्याचे दुःख नाही, पण चांगले काम करणारे सरकार तुम्ही पाडले. खंडोजी खोपडेची औलाद, गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

राहुल गांधींना सल्लायावेळी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांनाही सावरकरांच्या मुद्द्यावरुन सल्ला दिला. 'वीर सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. भाजपविरोधात सोबत लढायचे असेल तर दैवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. चाफेकर बंधुंना फाशी दिल्यानंतर अवघ्या 15 वर्षांच्या सावरकरणांनी इंग्रजांना मारण्याची शपध घेतली होती. सावरकरांनी 14 वर्षे काय मरण यातना सहन केल्या, त्याचा विचारही करता येणार नाही. राहुल गांधी आपण एकत्र आलो आहोत, ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. फाटे फुटू देऊ नका, तुम्हाला डिवचलं जातंय, आता वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही,' असंही ते यावेली म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस