शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं..."; संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:29 IST

आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

अहमदनगर - आम्हाला राजकीय विरोध होतोय. हिंदुत्व नकली आहे असा आरोप आमच्यावर करतात. तुम्ही हिंदुत्वासाठी काय करताय? हिंदुत्व दाखवण्याची गोष्ट नसते. हिंदुत्व हा आपला संस्कार, संस्कृती, जगण्यातील भावना आहे. उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं, मशिदीवर दगडे मारायची, मुस्लिमांविरोधात बोलायचे याला हिंदुत्व मानायला बाळासाहेब ठाकरे कधीच तयार नव्हते असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

खा. संजय राऊत म्हणाले की, आमच्या हिंदुत्वाचा आधार सावरकर आहेत. जगभरात प्रत्येकाचा विचार असतो. ज्यांची विचारांचा पाया दिला त्यांचेही पुतळे लोकांनी पाडले होते. जगातील कामगारांनी एक व्हा या क्रांतीला बळ दिले असेल तर लेनिन मार्क्स यांनी. महाराष्ट्राच्या असंख्य चळवळीत डाव्या विचारांचे लोक होते. कॉ. डांगे, जॉर्ड फर्नाडिंस, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कम्युनिस्टांचा सहभाग होता असं राऊत यांनी सांगितले. 

तसेच पक्ष कोणाचा हे जनता ठरवेल. निवडणूक आयोग नाही. ही शिवसेना लोकांनी निर्माण केली आणि शिवसेनाप्रमुखपद जनतेने दिलेय हे बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे. निवडणूक आयोगाला विचारून शिवसेना स्थापन केली नव्हती. बाळासाहेब ठाकरे महापुरुष आहे हे नक्कीच आहे. आम्ही लोकांमध्ये असतो. लोकं निवडणुकीची वाट बघतायेत. खरोखर यांच्यात हिंमत असेल आणि स्वत:ला मर्द समजत असतील तर निवडणूक घ्या असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिले. 

दरम्यान, आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील. मी ठाण्यात उभा राहीन असं ते म्हणालेत. ही लढाई आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. ज्याने बेईमानांचे नेतृत्व केले अशा माणसांविरोधात ठामपणे आमचा नेता लढण्यासाठी उभा आहे. यातून महाराष्ट्राला, शिवसेनेला आणि तरुण पिढीला बळ मिळेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसची ताकद वाढली पाहिजेकाँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. काँग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची ताकद देशात वाढली पाहिजे. १०० पेक्षा जास्त जागा काँग्रेस जिंकत नाही तोवर परिवर्तन शक्य नाही. अनेक राज्यात काँग्रेसला विरोधाची स्पेस द्यायला तयार नाही. काँग्रेस कमकुवत होतेय. भाजपाला कमकुवत करून काँग्रेस टिकायला हवी. राष्ट्रीय स्तरावर काम करणारा कुठला तरी एक पक्ष हवा असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHindutvaहिंदुत्वBJPभाजपा