शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

उद्धव ठाकरेंनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं, पण...; प्रकाश आंबेडकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 10:36 IST

मराठा-ओबीसी आरक्षण वादावरून प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला असून फडणवीसांवरही आरोप केले आहेत.

सोलापूर - महाराष्ट्र जळतोय, जे सत्तेत येण्यासाठी लढत आहेत, त्यांनी ज्या प्रश्नावर महाराष्ट्र जळतोय त्यावर भूमिका घ्यायची नाही. त्याची कारणं काय हे मी लोकांसमोर मांडलं आहे. त्यांनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं पण मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी बोलावं असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

आरक्षण बचाव यात्रा ही सोलापूरमध्ये पोहचली त्याठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी आम्ही आरक्षणावर जनजागृती करत आहोत. शरद पवार यांनी आरक्षणावर जे विधान केले ती राजकीय पळवाट आहे. पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आला तर तुम्हाला याला तोंड द्यावं लागणार आहे. तुम्हाला उद्या तोंड द्यायचे असेल तर जरांगे यांच्या मागणीच्या तुम्ही बाजूने आहात की विरोधात आहात हे तुम्हाला स्पष्टपणे मांडता आले पाहिजे. या पळवाटा म्हणजे हे सगळेजण ओबीसींच्या विरोधातले आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केली.

तसेच राजकीय भूमिका घेतली तर त्या भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो. आम्ही भूमिका घेतली त्यावर मराठा आणि ओबीसीही नाराज नाही. ही व्यवहार्य भूमिका आहे. मी जरांगे, हाके सगळ्यांनाच भेटायला गेलो होतो. कुणाला भेटल्याने भूमिका बदलत नाही. गरीब मराठा आणि ओबीसी यांचं २ ताट हवेत, ही संकल्पना वंचितची आहे. ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना घुसवता येऊ नये ही आमची मागणी आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर वेगळे दिले पाहिजे. त्याचा वेगळा विचार होऊ शकतो असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

जरांगे-फडणवीस भांडण नकली

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांचे नकली भांडण आहे. ते फसवण्याचं भांडण आहे कारण जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टार्गेट केले आहे. टार्गेट करून ओबींसींना असं वाटतंय जरांगेविरोधात कोण तर ते देवेंद्र फडणवीस, मग आपले फडणवीस असं सुरू झालंय. देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत ती भाजपा यावर भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळे जरांगे-फडणवीस यांचं भांडण ठरवून झालेले आहे. ओबीसींना फसवण्यासाठी हे भांडण आहे असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीसांवर केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस