शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
2
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
3
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
4
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
6
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
7
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?
8
मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 
9
आदिवासी महिलेने मोदींना का पाठवले १०० रुपये?; पंतप्रधानांनीच सांगितलं कारण, म्हणाले...
10
निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा
11
Video: आरतीचं ताट, बुके अन् हार; Bigg Boss फेम अरबाज पटेलचं असं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत
12
Supriya Sule : "खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार
14
“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक
15
IND vs NZ : "आम्ही प्रयत्न केला पण...", लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची रोखठोक उत्तरं
16
RSS च्या कार्यक्रमात बाप-लेकाचा चाकू हल्ला, 10 जण जखमी; आरोपीच्या घरावर बुलडोझर...
17
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
18
'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'
19
WTC Points Table : टॉपर टीम इंडियाला मोठा धक्का; फायनलचा मार्ग खडतर होण्याची भीती
20
Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले

उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:52 PM

Sanjay Raut, Uddhav Thackeray: महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार, संजय राऊतांचे संकेत.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यात तू तू-मै मै झाल्याची चर्चा असतानाच शनिवारी दुपारी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बैठक पार पडली. यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी विषय महत्वाचा आणि गंभीर असल्याचे सूतोवाच केले आहे. 

मविआचे जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे. परंतू एकूणच प्रकरण जागावाटपावरूनच असल्याचे समजते आहे. ''काल साधारण दहा तास बैठक झाली. आज सकाळी माझी आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार आहोत'', असे संकेत राऊत यांनी दिले आहेत.

आम्हाला असे वाटते की महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे महाराष्ट्रात संविधान बचावची मुव्हमेंट आहे ती यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून पराभव करू शकलो. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकडीचा पराभव सहज करू शकतो, असे राऊत म्हणाले. 

शिवसेनेने ज्या अर्थी मातोश्रीवर तातडीची बैठक घेत आहे, त्या अर्थी हा विषय महत्त्वाचा आणि गंभीर आहे, असे संकेत राऊत यांनी दिले आहेत.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना