शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’, भाजपाचा बोचरा वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:01 IST

Uddhav Thackeray: मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावला होता. त्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर घडलेल्या घडामोडी, सत्तांतर यादरम्यानची राज्यपालांची भूमिका, शिंदे गटाकडून करण्यात येणारे दावे, यावर ताशेरे ओढले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुन्हा आणता आलं असतं, अशीही टिप्पणी केली. त्यावर मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नैतिकतेला जागून राजीनामा दिला असं म्हणतात, मात्र ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती, असा टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेल्या दाव्यांबाबत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, आता उद्धव ठाकरे एकीकडे न्याय मेला नाही आहे, असं म्हणतात. तर दुसरीकडे महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे असंही म्हणताहेत. त्यांना नक्की काय म्हणायचं आहे? उद्धव ठाकरे आपण नैतिकतेला जागून राजीनामा दिला म्हणतात. ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती.तुम्ही राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वोच्च ठेऊन मुख्यमंत्री झालात. किमान सरकार तर धीटपणे चालवायचं होतं. विचारधारा सोडली, पक्षातले साथीदार सोडून गेले, तरी नाही समजलं एवढा अहंकार मोठा कसा झाला ?, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाने कोणालाही फोडून कोणाच्याही दावणीला बांधलं नाही आहे. दावणीला बांधणं काय असतं, हे अडीच वर्षात मविआ काळात सगळ्या जनतेनं बघितलं आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेसाठी विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत जाणं, म्हणजे दावणीला बांधणं असतं. वेळ गेली असली, तरी अजूनही विचार करा, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष