शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

उल्हासनगरवासीयांना पुन्हा विस्थापित होऊ देणार नाही; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 7:37 PM

Jitendra Awhad Ulhasnagar : पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे संकेत.  

ठळक मुद्देपुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे संकेत.  

उल्हासनगर : शहरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून शहरवासीयांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढू असे संकेत दिले.

उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याच्या पाश्वभूमीवर १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतीला स्ट्रॅक्टरल नोटीसा दिल्याने, धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून धोकादायक यादीतील ११६ इमारतीचे पाणी व वीज पुरवठा खंडित करून काही इमारतीवर तोडू कारवाई सुरू केल्याने, शहरात संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. उल्हासनगर ट्रेड असोसिएशन व धोकादायक इमारती मधील रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्बांधणी साठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे साकडे घातले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी पक्षाची जिल्हाध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे शहरवासीयांच्या समस्या ऐकण्यासाठी शहरातील ईगल हॉटेलमध्ये आले होते. 

यावेळी नागरिकांनी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव ४ चटईक्षेत्र, जमीन मालकीहक्क, इमारत नियमित करणे, सन २००६ चा रेडी रेकनार दर लावणे, भिवंडी आमंत्रण मध्ये ५०० प्लॉट देणे, इमारतीचे वीज व पाणी पुरवठा खंडित न करणे, इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत देणे आदी मागण्या करण्यात आल्या. शहरातील धोकादायक व अवैध इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून नागरिकांना विस्थापित होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देऊन याबाबत १५ दिवसात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधितांना सोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. 

यातून मार्ग काढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी माजी महापौर हरदास माखीजा, पंचम कलानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी आदी उपस्थित होते. पालकमंत्री व नगरविकास मंत्री यांनी गेल्या आठवड्यात शहरातील अवैध व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. मात्र ऐन वेळी बैठक रद्द केल्याने, शहरवासीयांकडून टीका होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शहरवासीयांना दिलासा देतील. अशी आशा यावेळी बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली. 

आयुक्त दयानिधी बाबत नाराजीकायम महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशाने १० वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट नोटीसा दिल्याने, शहरवासीयांवर विस्थापित होण्याची वेळ आल्याची टीका नागरिकांनी केली. हजारो नागरिकांवर विस्थापितांची वेळ आणल्याबद्दल अशा आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी करून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडulhasnagarउल्हासनगरMaharashtraमहाराष्ट्रHomeघर