शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यास अल्टीमेटम

By admin | Published: November 20, 2015 1:14 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आता राज्य शासनाने या धार्मिक स्थळांबाबतच्या कारवाईसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असून, निष्कासनासाठी नऊ महिन्यांचा

यवतमाळ : मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आता राज्य शासनाने या धार्मिक स्थळांबाबतच्या कारवाईसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असून, निष्कासनासाठी नऊ महिन्यांचा अल्टीमेटम संबंधित प्रशासनाला देण्यात आला आहे. राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे, नियमित करणे व स्थलांतरित करण्याची कारवाई होत नसल्याने, न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गृह विभागाने बुधवारी हा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. उपरोक्त तारखेपूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सहा ते नऊ महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागणार आहे. २९ सप्टेंबर २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांवर या धार्मिक स्थळांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, पोलीस आयुक्त त्यांना आवश्यकतेनुसार बंदोबस्त उपलब्ध करून देणार आहे. ग्रामीण भागात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या कार्यवाहीवर विभागीय महसूल आयुक्तांचे नियंत्रण असेल. अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, अमरावती व औरंगाबाद शहरात महापालिका स्तरावर समित्यांचे गठनही करण्यात आले आहे.