शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
3
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
4
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
5
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
6
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
7
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
8
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
9
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
10
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
11
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
12
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
13
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
14
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
15
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
16
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
17
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
19
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'

‘अनधिकृत छावण्या नियमित करणार’

By admin | Published: February 18, 2016 6:53 AM

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या अतिदुष्काळी जिल्ह्यांमध्ये अनेक अनधिकृत चारा छावण्या चालविल्या जात असून, सरकारने या छावण्याचालकांनी सरकारकडे अर्ज केल्यास त्या नियमित केल्या जातील

मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या अतिदुष्काळी जिल्ह्यांमध्ये अनेक अनधिकृत चारा छावण्या चालविल्या जात असून, सरकारने या छावण्याचालकांनी सरकारकडे अर्ज केल्यास त्या नियमित केल्या जातील, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात सांगितले. या जिल्ह्यांमध्ये सध्या अधिकृत २३७ चारा छावण्या सुरू असून, २ लाख १७ हजार जनावरे आहेत. त्या ठिकाणी चारा-पाणी पुरविण्यावर दररोज १ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जात आहेत. गरज असेल तिथे आणखी छावण्या दिल्या जातील. कोणतीही चारा छावणी बंद केली जाणार नाही, या बाबतचा आदेश मी कालच स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. आणखी २०० छावण्या सुरू करण्याची मागणी आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा पाहणी करून गरज असेल तिथे छावणी देईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी पाऊस पडल्याने बीडमध्ये ३ लाख ८० हजार टन, उस्मानाबादमध्ये २.७७ लाख टन तर लातूर जिल्ह्यात ४ लाख २५२०० टन चारा आहे. त्यामुळे गरज नसल्यास चारा छावण्या नकोत, अशी भूमिका घेतली होती. पण लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यानंतर एकही चारा छावणी बंद करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याचे खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)