शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

अनधिकृत धार्मिक स्थळे लपवली

By admin | Published: April 26, 2016 4:20 AM

सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार राज्य शासनाने शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यास सांगूनदेखील मीरा-भार्इंदर महापालिका टोलवाटोलवी करीत आहे.

धीरज परब,

मीरा रोड- सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार राज्य शासनाने शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यास सांगूनदेखील मीरा-भार्इंदर महापालिका टोलवाटोलवी करीत आहे. पालिकेच्या यादीतून सुविधा भूखंडांवरील (आरजी) अनधिकृत धार्मिक स्थळांना सोयीस्करपणे वगळले असून बिल्डरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनेक बेकायदा धार्मिक स्थळांची नावे आणि क्षेत्रफळ याचा तपशील व्यवस्थित गोळा केला नाही.राज्य शासनाच्या २००१ मधील एका आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळे उभारू नये. शिवाय, खाजगी जागेत धार्मिक स्थळ उभारण्यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. पालिका, पोलीस व महसूल विभागाने स्थानिक स्तरावर नियमांचे काटेकोर पालन न केल्याने शहरातील रस्ते, पदपथ, आरक्षणे, सार्वजनिक जागा, सीआरझेड आदी ठिकाणी सर्रास अनधिकृत धार्मिक स्थळे उभी राहिली आहेत. २००६ साली ‘पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हील’ यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याबद्दल २०१० साली सोसायटी फॉर जस्टीस व इतर संस्था यांनी मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका दाखल केली. २०११ साली राज्य शासनाने सार्वजनिक व शासकीय जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्यासाठी आदेश जारी केले. मीरा-भार्इंदर महापालिकेने शासन आदेशानंतर शहरातील ७८ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रभाग समितीनिहाय तयार केली. त्यामध्ये पालिकेने केवळ ‘अ’ व ‘ब’, अशी दोनच वर्गवारी केली आहे. ‘अ’ वर्गातील म्हणजेच नियमित करण्याजोगी ३४ तर ‘ब’ म्हणजेच अनधिकृत तथा हटवण्यायोग्य अशा ४४ धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली होती. अनधिकृत धार्मिक स्थळे सात दिवसांत हटवा, अशा नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या. पण, नेहमीप्रमाणेच त्या कुचकामी ठरल्या. ८ आॅक्टोबर २०१५ रोजी न्यायालयाने शासन यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी करीत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी कालबद्ध कार्यक्र म आखण्याचे आदेश दिले होते. भाजपा-शिवसेना युती शासनाने त्यानुसार नोव्हेंबर २०१५ मध्ये नवीन आदेश काढत २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची निष्कासित करण्याजोगी धार्मिक स्थळे दोन वर्षांत तोडावी, असे आदेश दिले. स्थलांतरित होऊ शकणारी धार्मिक स्थळे ६ ते ९ महिन्यांत स्थलांतरित करावीत तसेच नियमित करण्याजोगी धार्मिक स्थळे ६ महिन्यांत नियमित करून घ्यावी, असे स्पष्ट कळवले आहे. तर, २९ सप्टेंबर २००९ नंतरची सर्वच धार्मिक स्थळे नऊ महिन्यांत तोडण्याचे आदेशदेखील राज्य शासनाने दिले. परंतु, मीरा-भार्इंदर महापालिकेने न्यायालय व शासन आदेशाला हरताळ फासून पूर्वी जाहीर केलेली अनधिकृत धार्मिक स्थळांची जुनी यादीच ६ एप्रिल रोजी जाहीर केली आहे. ‘ब’ वर्गातील ४४ पैकी ५ धार्मिक स्थळे पालिकेने तोडल्याचा दावा केला, तर १७ धार्मिक स्थळे एमएमआरडीएच्या हद्दीत गेल्याने ‘ब’ वर्गातील धार्मिक स्थळांची संख्या आता २२ इतकीच राहिली आहे. ‘अ’ वर्गातील धार्मिक स्थळांची संख्या मात्र ३४ इतकी कायम आहे. परंतु, नव्याने यादी जाहीर करताना पालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केलेच नाही. असंख्य धार्मिक स्थळांचा यादीत समावेशच नाही. इतकेच नव्हे तर यादीत जाहीर केलेल्या धार्मिक स्थळांचे क्षेत्रफळदेखील तद्दन खोटे नमूद केले आहे. अनेक धार्मिक स्थळांबद्दल लोकांनी तक्र ारी करूनदेखील पालिका व पोलीस प्रशासनाने केवळ वेळकाढूपणाच केला,जेणेकरून धार्मिक वाद चिघळत ठेवण्याचे काम या यंत्रणांनी केले. सुविधा भूखंडांमध्ये (आरजी) मोठ्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे बांधली असताना पालिकेच्या यादीत मात्र एकाही आरजी भूखंडावर अनधिकृत धार्मिक स्थळाचा साधा उल्लेखही नाही. आरजीच्या जागा गृहसंकुलात सदनिका खरेदी करणाऱ्या रहिवाशांच्या करमणुकीकरिता वापरात आणणे बंधनकारक आहे. परंतु शहरातील शांतीनगर, शांती पार्क, शीतलनगर, जांगीड कॉम्प्लेक्स, तिरु पती-बालाजी कॉम्प्लेक्स, पद्मावती गोल्डन नेस्ट आदी लहानमोठ्या वसाहतींमध्ये सर्रास आरजी व मोकळ्या जागांत बिल्डरांच्या कृपेने अनधिकृत धार्मिक स्थळे न्यायालय व शासन आदेशाला वाकुल्या दाखवत उभी आहेत.