शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

...तर भारताची निर्यात दुप्पट, लाखो रोजगार, गरिबी दूर होईल; गडकरींनी सांगितला भन्नाट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 16:37 IST

Nitin Gadkari News: भारताची निर्यात दुप्पट होऊ शकते, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Nitin Gadkari News: आताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर शतकी वाटचाल करत आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी आहे. तसेच बायोफ्युएल, बी एलएनजी, अशा विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. यातच देशात लाखो रोजगार निर्माण होऊ शकतील, गरिबी दूर होऊ शकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात वाहतुकीचा खर्च खूप जास्त आहे. भारतातील वाहतुकीचा खर्च १६ टक्के एवढा प्रचंड आहे. तर चीनमध्ये तोच दर ८ टक्के आहे आणि अमेरिकेत १२ टक्के एवढा आहे. एलएनजीसारख्या जैव इंधनाच्या माध्यमातून भारताला वाहतुकीचा खर्च ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळाले, तर भारताची निर्यात दुप्पट होऊन लाखो रोजगार निर्मिती होईल, भारताची गरिबी दूर होईल, असे गडकरी यांनी नमूद केले.

देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल

तत्पूर्वी एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी म्हटले होते की, देशात इथेनॉल आधारित पेट्रोल पंप सुरू होत आहे. देशातील सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना इथेनॉल चालणारे वाहन उत्पादन करण्यास लावले आहे. शेतकरी खाद्य पिकांच्या उत्पादन करून श्रीमंत होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांनी बायोफ्युएल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात वाटा द्यावा, त्याच्यातून ते श्रीमंत होऊ शकतात, असे गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान, देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल, विमानांना उडवण्यासाठी लागणारे एअर फ्युल तयार करेल, असे गेल्या पंधरा वर्षापासून बोलत होतो. शेती क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी म्हणायचे की, साहेब काहीही बोलतात. माझ्या पाठीमागे माझ्या वक्तव्याची खिल्ली उडवायचे, माझ्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती, मात्र आता आनंद आहे की, आपल्या देशातील शेतकरी इंधन उत्पादनामध्ये माध्यमातून आपला वाटा देत आहेत, असे गडकरी म्हणाले होते. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी