शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

“मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 5:02 PM

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Maratha Reservation: जालन्यातील अंतरवालीमधील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसेच आरक्षणाची मागणी अधिक तीव्रतेने मांडली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आठवडाभरापासून अधिक दिवस उपोषण सुरू आहे. अनेक नेते, मंत्री जालन्यात जाऊन आले. मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. यातच आता मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलन, आरक्षण या मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

जालन्याच्या अंतरवाली गावात मनोज जरांडे पाटील उपोषणाला बसलेत त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजात मागासलेली कुटुंब आहेत त्यांना आरक्षण द्यावे लागेल. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, असे त्यांचे मत आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाढ करून मराठा समाजाला त्यात टाकता येत का, हे बघावे किंवा वेगळा विचार होतो का हेही पाहावे, असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी मांडले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केलेली टीका ही राजकीय आहे, असे सांगत राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक आहे. जरांडे पाटील यांना भेटून पाठिंबा जाहीर करणार आहे. माझ्या पक्षाची मागणी आहे की, जातीनिहाय जनगणना केली तर सगळ्या जातींचा टक्का समजेल आणि त्यांचा त्यांचा वाटा त्यांना मिळेल. केंद्र सरकारने त्याचा विचार करावा, असे रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, आम्ही सगळे भारतीय आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत हे नाव ओरिजनल आहे, INDIA हे इंग्रजी नाव आहे, त्याला विरोधकांनी विरोध करणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवले