शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
2
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
3
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
4
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
5
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
6
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
7
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
8
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
9
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
10
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
11
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
12
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
13
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
14
Jio, Airtel, Vi चे रिचार्ज प्लॅन्स होऊ शकतात स्वस्त, सरकारकडे केली मागणी; काय आहे प्रकरण?
15
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
16
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
17
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
18
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
19
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
20
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

अवकाळीचा तडाखा : सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 5:32 AM

राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

पुणे : राज्यात गेल्या पंधरवड्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे अर्ज केला आहे.राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

काढणीला आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, हरभरा काढणीला आला होता, तर काही शेतकऱ्यांच्या काढणीला केलेल्या पिकांवर पावसाचे पाणी फिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष, आंबा, केळी, मोसंबी या फळपिकांचा जमिनीवर सडा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय स्थानिक आपत्तीसाठी अर्ज नगर १,१२६, नाशिक २१६, चंद्रपूर ११, कोल्हापूर १, जालना ११,८८२, गोंदिया ५, सोलापूर १,१९२, जळगाव ६१७, सातारा ४, छ. संभाजीनगर ६,८९५, भंडारा १३, वाशिम १,३४१, बुलढाणा ३,०२५, नंदुरबार १,७३३, सांगली ३०१, यवतमाळ १६,०१९, अमरावती १,८४८, गडचिरोली ७, धाराशिव ५,२२४, लातूर १३,७६४, परभणी ६,०१०, वर्धा ३४०, नागपूर ४०४, हिंगोली २,०८०, अकोला २,९१६, धुळे ३,६७०, पुणे ६७, नांदेड ५६,३३५, बीड २१,७६३, एकूण १,६०,८०९

जिल्ह्यानुसार काढणीपश्चात नुकसान अर्जनगर २१७, नाशिक ३४, चंद्रपूर २, जालना १,७७९, गोंदिया ८, सोलापूर १,६०७, जळगाव ४३७, सातारा ८, वर्धा १,७५६, बुलढाणा ३,९३४, नंदुरबार १६२, सांगली ३१, यवतमाळ १३,६९५, अमरावती १,६३०, गडचिरोली २९, धाराशिव ३,४२३, लातूर ८,९८५, परभणी ७,४६४, वर्धा १०१, नागपूर ११५, हिंगोली २,०८६, अकोला १,६२२, धुळे १६१, पुणे ८, बीड ४,७४१, एकूण ५६,७२२.

राज्यातून १ लाख ६० हजार ८०९ अर्ज विमा कंपन्यांकडे आले आहेत. नुकसानभरपाईचा अर्ज आल्यानंतर त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ५ हजार २४१ अर्जदारांचे सर्वेक्षण झाले आहे, तर ५५ हजार ५६८ अर्जांचे सर्वेक्षण झालेेले नाही.

काढणीपश्चात नुकसान झालेल्यांमध्ये ५६ हजार ७२२ अर्ज आले आहेत. त्यापैकी २७ हजार ५२४ अर्जांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, २९ हजार १९८ अर्जांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. यात सर्वाधिक १३ हजार ६९५ अर्ज यवतमाळमधून आले आहेत. त्याखालोखाल ८ हजार ९८५ अर्ज लातूरमधून आले आहेत.

उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४०, ६०, ७५, ८५ व १०० टक्के भरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करावा. नुकसान झालेली बहुतेक पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई चांगली मिळणार आहे.- विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग

टॅग्स :Farmerशेतकरी