शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

कर्जमाफी होईपर्यंत ‘संघर्ष’ सुरूच!

By admin | Published: April 07, 2017 5:24 AM

कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही.

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणेसाठी मुहूर्त न शोधता त्वरित घोषणा करावी,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.कऱ्हाड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, ते स्पष्ट होते. आम्ही विरोधी पक्षात असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी लावून धरली. पण १९ आमदारांना निलंबित करण्याचे पाप सरकारने केले. तमिळनाडू व उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना काही अटी, शर्ती घालून कर्जमाफी केली. पण महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी हवी आहे; आणि ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’’सभागृहामध्ये कितीही मुद्दे मांडले तरी हे सरकार त्याला दाद देत नाही. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधकांनी चांदा ते बांदापर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले असून, संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात ही संघर्ष यात्रा काढली जाणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>...तर मी त्यांना पहिला हार घालेनसुरुवातीला कर्जमाफीला विरोध करणारे मुख्यमंत्री आता योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेईन, असे सांगतात. परंतु त्यांची ही योग्य वेळ अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर येणार आहे? शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांनी जर संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला तर मी पहिल्यांदा त्यांना हार घालून अभिनंदन करेन. - आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री