शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

UP Election Result 2022 : "युपीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली तरी महाराष्ट्रातील नेत्यांना खुश होण्याचं कारण काय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:54 IST

रोहित पवारांचा सवाल. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात सत्तेत होता, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राची ताकद कमी करत होता, रोहित पवार यांचं वक्तव्य.

UP Election Result 2022 : आज पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सध्या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असून समोर येत असलेल्या कलांनुसार पंजाब वगळता सर्वच राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येतंय. युपीतही भाजपनं मोठी मुसंडी मारली असून महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून युपीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली तरी महाराष्ट्रातील नेत्यांना खुश होण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

"युपीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली तरी महाराष्ट्रातील नेत्यांना खुश होण्याचं कारण काय? तुम्ही महाराष्ट्राच्या हिताबद्दल विचार केला पाहिजे. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात सत्तेत होता, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राची ताकद कमी करत होता. तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राच्या अस्मितेचं काही पडलं नव्हतं का?," असा सवालही रोहित पवार यांनी केला. 

"... तेव्हाही तुम्ही शांत बसला""महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी जे सेंटर महत्त्वाचं होतं, ज्यातून शिक्षित युवा पीढीला लाखापेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या, त्या तुमच्या काळात गुजरातला गेल्या. डायमंड ट्रेडही मोठ्या प्रमाणात गुजरातला गेलं, शिपबिल्डिंग गुजरातला गेला तेव्हाही तुम्ही शांत बसला. मरीन पोलीस सेंटर जे पालघरला होणार होतं, तेही गुजरातला गेलं तेव्हाही शांत बसला, जेव्हा महाराष्ट्राची ताकद कमी केली जात होती, तेव्हा आंदोलन केलं गेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलले तेव्हाही आंदोलन केलं नाही. कुठेतरी तुम्हाला तुमचं राजकीय हित आवश्यक आहे. महाराष्ट्राचं मुंबईचं महत्त्व कमी होत होतं तेव्हा तुम्ही शांत होता हेच महाराष्ट्रासाठी खरंतर अन्यायाची भूमिका आहे. भाजपनं या पाच सहा गोष्टी गेल्या पाच वर्षांत केल्या तर कदाचित मुंबईलाही केंद्रशासित प्रदेशही केलं असतं असा लोकांचं म्हणणं आहे. युपीत जे काही झालं तर महाराष्ट्रात बदल होईल असं वाटत असेल तर अशा प्रकारे तुलना करणं योग्य नाही," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र