शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

युपीत मराठी; भाजपच्या अपयशाची कबुली, कृपाशंकर सिंहांच्या पत्रावर काॅंग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:25 IST

सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुंबई : रोजगाराच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठीचा समावेश करण्याची भाजप नेते कृपाशंकर सिंह यांची मागणी म्हणजे भाजपच्या अपयशाची कबुली आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार रोजगार निर्मितीत अपयशी ठरले आहे. त्यामुळे रोजगाराचा स्रोत म्हणून उत्तर प्रदेश हा महाराष्ट्रावर अवलंबून आहे. त्याची कबुली सिंह यांच्या पत्राने दिल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात भाजपने स्वतःला उघडे तर पाडलेच पण उत्तर प्रदेशमधील स्वतःच्या सरकारची अक्षमता देखील उघड केली आहे. तर महाराष्ट्राने स्थलांतरितांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला होता. प्रत्यक्षात त्यांच्याच सरकारने वाईट वागणूक दिल्याचे जगाने पाहिले, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काय आहे पत्रात? सिंग यांनी अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात वैकल्पिक विषय म्हणून मराठीचा समावेश करण्याची मागणी केली. मी महाराष्ट्रात ५० वर्षांपासून राहतो. रोजगाराच्या शोधात तरुण महाराष्ट्रात येतात. मात्र, मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांना अनेक रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे युपीतील शालेय शिक्षणात मराठीचा पर्याय द्यावा. जेणेकरून इथल्या राज्य सरकार व महामंडळे, पालिकांमधील रोजगाराच्या संधी मिळू शकतील, अशी मागणी कृपाशंकर यांनी केली होती.

टॅग्स :Kripashankar Singhकृपाशंकर सिंगSachin sawantसचिन सावंत