शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘संपुआ’ सरकारने केले होते ४ ‘सर्जिकल स्ट्राईक’ - शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2016 5:14 PM

माझ्या कार्यकाळात 4 वेळा सर्जिकल स्ट्राइक झालं होतं, मात्र आम्ही त्याचा कधीही गवगवा केला नाही

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.06 -  ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्द्यावरुन देशातील राजकारण तापायला सुरुवात झाली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘बॉम्बगोळा’ टाकला आहे. मोदी सरकारने उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी टाकलेल्या पावलाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र त्याचा गवगवा करणे योग्य नाही. ‘संपुआ’ सरकारच्या काळात सैन्याने ४ वेळा पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले केले होते. परंतु त्याचा गवगवा करण्यात आला नव्हता, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

उरी येथे सैन्यदलाच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याने देशवासीयांचे मन हेलावून गेले. सर्वांनाच चीड आली होती व आता बदला घेतलाच पाहिजे ही देशाची भावना होती. एरवी केंद्र शासनाच्या विविध बाबींवर मी टीका करतो. परंतु दहशतवाद्यांची शिबीरे उध्वस्त करण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागतच करतो. मात्र अशा संकटांना तोंड द्यायचे असते. कारवाई केल्यानंतर गवगवा करण्याची बाब खटकली आहे. देशाला एकसंघ ठेवणे ही राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले. 
 
देशाने एक व्हायला हवे
 
देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर राजकारण व्हायला नको. निवडणूका येतात आणि जातात. परंतु देशाची सीमा अखंड आणि सुरक्षित रहायला हवी. देशावर संकट येत असेल तर संपूर्ण देशाने एकत्र व्हायला हवे. या मुद्द्यावर आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत व कधीही राजकारण आणणार नाही, असे शरद पवार म्हणाले.