शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

औरंगाबाद जिल्ह्यात साडेआठशे एकरवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 7:56 PM

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 22 -  कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील १७ शेतकरी गटांनी पुढे येऊन सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. या शेतीवर कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने खरिपाचे पीक घेण्यात येत आहे.केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आत्माला प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेती करणारे गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २४ शेतकरी गटांचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामात त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ शेतकरी गट स्थापन होऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली आहे. गंगापूर तालुक्यात कासोडा, खुलताबाद तालुक्यात वेरूळ, कन्नड तालुक्यात वाकद, आडगाव, कविटखेडा, सोयगाव तालुक्यात जरंडी, औरंगाबाद तालुक्यात पळशी आदी ठिकाणी हे गट स्थापन झाले आहेत. प्रत्येक गटात पन्नास शेतकरी असून, त्या सर्वांनी आत्मा कार्यालयात सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. आता खरिपाचे पीक निघाल्यानंतर आत्माकडून या शेतकऱ्यांना सेंद्रिय पिकांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठीही कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे. शेतीत रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर करणार नसल्याची हमी शेतकऱ्यांनी दिली आहे. त्याऐवजी या शेतकऱ्यांना गांडूळ खत, जैविक खते वापराविषयीचे प्रशिक्षण कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील या साडेआठशे एकर शेतजमिनीवर प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, हरभरा यासारख्या कडधान्यांची पेरणी करण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने फळभाज्यांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ गट स्थापन झाले असून, आणखी ७ गटांची स्थापना केली जाणार आहे.

सेंद्रिय शेतीचे फायदे...उत्पादन खर्चात बचत.जमिनीचा पोत सुधारण्यास मदत. उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा.सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाला अधिक भाव.शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती अधिक फायद्याची आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाची विक्री करण्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे.- सतीश शिरडकर, उपसंचालक, आत्मा