शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग

By admin | Published: March 03, 2017 1:28 AM

रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

जयदीप हिरवे,पेठ- रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी झिरो बजेट नैसर्गिकशेती हाच एकमेव पर्याय असल्याने पेठ येथील उमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत लसूण या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.कंधारे यांनी सुमारे ४० गुंठे शेतीक्षेत्रात लसूण या पिकाच्या ४ गोण्यांची लागवड केली. या लसूण पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा या पिकाचेदेखील यशस्वी उत्पादन त्यांनी घेतले. शेतात सऱ्या पाडून लसूण पिकाची लागवड करण्यात आली. दोन सऱ्यांमध्ये टोकण पद्धतीने हरभरा पीक घेतले. लसूण पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरण्यात आली. लसूण पिकाची लागवड, मजुरी व काढणीसाठी असा एकूण ४५ ते ५० हजार रुपये भांडवली खर्च आला. सुमारे साडेतीन महिन्यांतच लसूण काढणीस आला. लसणाच्या एका गोणीपाठीमागे १० गोण्या अशा एकूण ४० गोणी लसूण पिकाचे भरघोस उत्पादन निघाले.शेतीतज्ज्ञ सुभाष पालेकर यांच्यापासून प्रेरणा घेत कंधारे यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. कंधारे यांनी सर्वप्रथम देशी गायींचे संगोपन करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात ५ देशी गायी आहेत. देशी गायीचे दूध व मलमूत्र आरोग्यवर्धक आहे. तसेच शेतामध्येही मलमूत्रापासून तयार केलेल्या जीवामृतच्या फवारण्या केल्या आहेत.मोकळी हवा व चांगल्या सूर्यप्रकाशामुळे लसणाचे पीक जोमदार आले. त्यात ठिबकने पाणीपुरवठा असल्याने पिकाला गरजेपुरतेच पाणी मिळाले. देशी गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले जीवामृत याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्ती येते. याचबरोबर वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या १० झाडांचा पाला देशी गायीच्या गोमूत्रात कुजवून त्याचे दशपर्णी अर्क तयार करून त्याच्या तीन फवारण्या या लसूण पिकावर करण्यात आल्या. याचबरोबर जीवामृत एकदा पाण्याबरोबर सोडण्यात आले, एकदा पिकांवर शिंपडले व एकदा त्याची फवारणी करण्यात आली. सर्वांत शेवटी अंतिम टप्यात देशी गायीच्या ताकाची एकदा संपूर्ण पिकावर फवारणी केली असल्याचे कंधारे यांनी सांगितले. >जमिनीची सुपीकता चांगली राहतेउमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा अवलंब करत शेतीमध्ये त्यांनी स्वत:ला अक्षरक्ष: वाहून घेतले आहे. त्यांच्याकडे या नैसर्गिक शेतीचे कृषी पदवीधरापेक्षाही अधिक ज्ञान आहे. सर्वांनीच या नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. जेणेकरून जमिनीच्या सुपीकतेबरोबरच मानवाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे कंधारे सांगतात.