शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

कोकणात खोळंबली भातलावणीची कामे

By admin | Published: July 12, 2017 4:28 AM

सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ टक्के इतक्याच लावण्या पूर्ण झाल्या आहेत. रविवारपासून पावसाने पुनरागमन केल्यामुळे येत्या काही दिवसांत या कामाला अधिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.जूनमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. त्या काळात नांगरणी आणि पेरणीची कामे पारंपरिक वेळापत्रकानुसार झाली. मात्र जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने लावणीच्या कामाला चांगलीच खीळ बसली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तीन प्रकारची शेती आहे. डोंगर उतारावरची शेती, पायथ्याची शेती आणि सखल भागातील शेती. सद्य:स्थितीत सखल भागातील शेतीला पाण्याची कमतरता नाही. झालेल्या पावसाच्या आधारावर सखल भागातील लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, डोंगर उतारावरच्या आणि पायथ्याच्या शेतीला मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ७१ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेती केली जाते. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. नागली, वरी आणि भाजीपाल्याची लागवड तुलनेने खूपच कमी आहे. मात्र, त्यालाही पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने नांगरणी आणि पेरणीची कामे वेळेत झाली. त्यामुळे रोपे चांगली तयार झाली आहेत. मात्र, चिखलणीसाठी पाऊसच नसल्याने तयार झालेली रोपे सुकून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. >पंप लावून लावण्याज्या भागात शेताच्या जवळपास नदी किंवा मोठे ओढे आहेत, अशा भागात पंपाने पाणी खेचून शेती केली जात आहे. मात्र, त्यासाठी पंप भाड्याने आणावे लागत असल्याने ते खर्चिक होत आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहेत.जिल्हाएकूण क्षेत्रलावणी झालेलेटक्केहेक्टरमध्येक्षेत्र (हे.)रत्नागिरी७१,०००३९,०५०५५सिंधुदुर्ग५०,२३०२०,७२७४१