शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 17:00 IST

ऐनवेळी प्रकृतीचा कारण देत वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाला कळवल्याने,शिवसेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली होती.

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आलेले रमेश बोरनारे यांची विधानसभेत निवडून येण्याची पहिलीच वेळ आहे. वैजापूर मतदारसंघातून युतीकडून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने माजी आमदार आर.एम.वाणींना दिला होता. त्यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेल्या रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस वाणी यांनी केली होती. विशेष म्हणजे वाणींनी सुचवलेल्या या उमेदवाराला वैजापूरकरांनी पसंती देत विधानसभेत पाठवले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून वैजापूर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिलेले आर.एम वाणी यांच्या नवाची चर्चा सुरु होती. मात्र ऐनवेळी प्रकृतीचा कारण देत वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाला कळवल्याने,शिवसेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली होती. परंतु वैजापूर मतदारसंघाबाबत शिवसेनेच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ, मात्र वैजापूरच्या उमेदवारीसाठी वाणींच्या शब्दाला महत्व असेल असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते.

वैजापूरच्या उमेदवारीसाठी वाणींच्या 'शब्दाला' महत्व असेल: चंद्रकात खैरे

पुढे पक्षाच्या बैठकीत वाणी यांनी रमेश बोरनारे यांचे नाव सुचवले आणि पक्षाने सुद्धा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवडणुकीच्या काळात बोरनारे यांना निवडणून आणण्यासाठी वाणींनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे वाणी यांनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी सुद्धा निवडून दिले. रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर यांचा तब्बल ५८ हजार ८१८ मतांनी पराभव करत विजय मिळवला.

वैजापूर मतदारसंघातून युतीकडून उमेदवारी मिळावी म्हणून माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र जागा युतीत शिवसेनेकडे असल्याने अखेर बोरनारे यांना उमेदवारी देण्यात आली. वाणी यांनी जरी माघार घेतली असली तरीही त्यांना मानणारा एक मोठ वर्ग मतदारसंघात असल्याने, पक्षाने उमेदवार सुचवण्याची जवाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. तर वाणी यांनी बोरनारे यांना उमेदवारी बरोबर आमदारकी सुद्धा मिळवून दिली.