शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेती अन् मातीसाठी लढणाऱ्या वैशाली येडेंना मतदारांनी डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:01 IST

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला.

मुंबई - परिवहन महामंडळाच्या बसमधून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या वैशाली येडे यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पराभव पत्करावा लागला. लोकशाही मार्गाने शेती आणि मातीसाठी लढा देण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशाली यांना मतदारांनी डावलले. देशात ५० टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. तर एक महिला खासदार बॉम्बस्फोट कटातील आरोप आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ही लोक लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी वैशाली येडे यांना मतदार डावलतात. याला लोकशाहीचे अपयश म्हणाव का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वैशाली यांचे पती सुधाकर यांनी आत्महत्या केली होती. नवऱ्याच्या निधनानंतर वैशाली देखील त्यांचा मार्ग निवडू शकत होत्या. मात्र वैशाली यांनी लढण्याचा निर्णय घेतला. हार न मानता वैशाली यांनी दोन मुलांचे संगोपन केले.

शेतकरीच शेतकऱ्यांची अडचण समजू शकतो, या मुद्दावर त्या लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्या. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्याकडे केवळ ५०० रुपये होते. निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचे मुख्य आव्हान होते. मी लोकांना पैसा आणि मत दोन्ही देण्याचे आवाहन केले, असं वैशाली सांगतात. पुरेसा पैसा नसल्यामुळे वैशाली यांनी महामंडळाच्या बसमधून प्रचार केला. शेतकरी प्रतिनिधी संसदेत पाठविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केल्याचे वैशाली यांनी म्हटले. परंतु, त्यांना यश आले नाही.

शेतकरी आत्महत्या, गरीबी आणि शेती क्षेत्रातील सुधारणांवर वैशाली यांनी निवडणूक लढवली. मात्र मतदार संघातील मतदारांनी या मुद्द्यांना फारसं प्राधान्य दिले नाही. मतदारांनी शेती आणि मातीसाठी लढा देणाऱ्या वैशाली येडे यांना नाकारले.

संधी मिळाल्यास पुन्हा लढणार

वैशाली येडे यांना लोकसभा निवडणुकीत २० हजार मते मिळाली. शेतकऱ्यांनी मला विजयी केले नाही. पण तरी देखील मी २० हजार मतदारांचा विश्वास संपादन करू शकले. त्यामुळे मी हार मानली नाही. संधी मिळाल्यास आपण पुन्हा निवडणूक लढवू, अस वैशाली येडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bachhu Kaduबच्चू कडूShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम