शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:05 IST

आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे.

Walmik Karad: बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड याने आज सीआयडीच्या पुणे कार्यालयात आत्मसमर्पण केले. मागच्या २२ दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडला बेड्या ठोकण्यात अपयश आलेल्या पोलीस प्रशासनावर टीका होत आहे. महाराष्ट्राभर ज्या हत्या प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात होता त्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मात्र कराड हा शरण येताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे की, "मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजी यांचे अभिनंदन," अशी पोस्ट नार्वेकर यांनी सोशल मीडियावर केली आहे.

काँग्रेसने काय आरोप केलाय?

वाल्मिक कराड याच्या आत्मसमर्पणावरून काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. "खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलीस-सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे. महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष  बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेMilind Narvekarमिलिंद नार्वेकर