शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
3
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
4
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
6
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
7
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
8
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
9
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
10
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
12
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
13
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
14
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
15
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
16
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
17
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
18
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
19
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
20
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; अनधिकृत बांधकामास जबाबदार नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 8:08 PM

मीरा भाईंदर महापालिका व सत्ताधारी भाजपने कोरोना संसर्ग व पावसात गोरगरिबांची घरे पाडून माणुसकीला काळीमा फासली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका व सत्ताधारी भाजपने कोरोना संसर्ग व पावसात गोरगरिबांची घरे पाडून माणुसकीला काळीमा फासला आहे. ही कारवाई निर्दयी असून झोपडी वासियांचे पुनर्वसन करा तसेच या बांधकामांना जबाबदार नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली आहे.  त्यासाठी सोमवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

काशीमीराच्या माशाचा पाडा मार्गावरील महापालिका मालकीच्या उद्यान व रस्ता आरक्षण मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन पक्की व कच्ची बेकायदेशीर बांधकामे झाली होती. शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील सुमारे ३०० कच्ची - पक्की अनाधिकृत बांधकामे पालिकेने तोडून टाकली होती. पालिकेच्या कारवाई नंतर बेघर झालेले झोपडीवासी त्याच ठिकाणी आपले बिर्‍हाड मांडून बसले. शनिवारी उर्वरित बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पालिका पथक जाणार होते. पण राजकीय हस्तक्षेप व पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण सूत्रांनी सांगत कारवाई केली गेली नाही.

दरम्यान  सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे मीरा भाईंदर अध्यक्ष सलीम खान यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  पालिका प्रवेशद्वारा बाहेर धरणे धरत कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महापालिका व स्थानिक भाजपा नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

महापालिकेची जागा होती तर त्यामध्ये बांधकामे झाली कशी ? या बांधकामांना कर आकारणी, पाणी,  वीज आदी सुविधा पालिकेने दिल्या होत्या. इतके होई पर्यंत नगरसेवक व अधिकारी झोपा काढत होते का ? याच्या मुळे गोरगरीब बेघर झाले व त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नगरसेवक, अधिकारी तसेच कर आकारणी, पाणी व वीज देणारे आदींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंचितचे शहर अध्यक्ष सलीम खान, प्रवक्ते महेंद्र चाफे, महिला अध्यक्षा मीना सोरटे, रंजना भगत, अनिल भगत आदींनी केली आहे. 

बेघर केलेल्याचे पालिकेने पुनर्वसन करावे . जय बजरंग नगर चे शौचालय पालिकेने काढले त्यावर उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृहनेते प्रशांत दळवी व स्थानिक भाजपा नगरसेवकांनी मानवताचा हवाला दिला होता. मग आता तर शेकडो लोकांचे संसार उध्वस्त करून सत्ताधारी भाजपाने मानवतावाद दाखवला आहे का ? अशी टीकेची झोड वंचितच्या आंदोलकांनी उठवली आहे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर