शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

५१ बैलगाडीतून वऱ्हाड पोहचले लग्नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2017 10:28 PM

सध्या पुरंदर तालुक्यात लग्नाचा हंगाम जोरात सुरु आहे. यानिमित्त सर्वत्र लग्न कार्यालयात पोहचण्यासाठी चारचाकीच्या युगात पारंपारीकतेला देखील महत्व आले आहे

ऑनालइन लोकमतसासवड, दि. 9 : सध्या पुरंदर तालुक्यात लग्नाचा हंगाम जोरात सुरु आहे. यानिमित्त सर्वत्र लग्न कार्यालयात पोहचण्यासाठी चारचाकीच्या युगात पारंपारीकतेला देखील महत्व आले आहे. वऱ्हाडी मंडळींना लग्न कार्यालयात पोहोचविण्यासाठी गाड्याच्या गाड्या डझनाने बुकिंग केल्या जात आहेत. अशी स्थिती असताना नारायणपूर येथील बोरकर कुंटुंबातील नवरदेव चक्क बैलगाडीतून लग्नाला आला. संपूर्ण बाजारपेठेतून मिरवणूक जात असताना नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी करून हा सोहळा पाहत होते.नारायणपूर येथील बाजीराव काळुराम बोरकर यांचे चिरंजीव नाथसाहेब बोरकर आणि शिवरी येथील पंढरीनाथ दत्तात्रय कदम यांची कन्या स्वाती कदम यांचा विवाह सोहळा सासवड जवळील एका कार्यालयात नुकताच मोठ्या थाटामाठात पार पडला. दोन्ही कुटुंबियांच्या वतीने हा सोहळा नयनरम्य होण्यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. वधूकडच्या मंडळींनी वऱ्हाडी मंडळींसाठी चार चाकी गाड्या बुक केल्या होत्या. त्यामुळे ते सर्व वऱ्हाड मोटारींमधून आले. सध्या गावोगावी दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये तर बैलगाड्या पाहायलाही मिळत नाही. मात्र नारायण पूरचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांच्याकडून आधुनिक काळातही शेतीचे आणि बैलाचे नाते कायम राहावे, तसेच कोणतेही प्रदूषण न होता लग्नसोहळाही पर्यावरण पूरक व्हावा याची काळजी घेण्यात आली होती. यानिमित्त वर मंडळींनी आपले वऱ्हाड चार चाकी गाड्यांमधून न नेता बैलगाडी जुंपून नेण्याचे ठरविले. घरातील बैलगाडी होतीच, त्याबरोबरच गावातील आणि परिसरातील मित्रांना लग्नाला येताना चारचाकी गाडी न आणता बैलगाडी घेऊन येण्याचे विंनंतीपूर्वक निमंत्रण देण्यात आले.विशेष म्हणजे सर्वांनीच बैलगाडीचे निमंत्रण स्वीकारत सकाळीच दारात बैलगाड्या जुंपून हजर केल्या. तसेच बैलगाड्या नीटनेटक्या दिसाव्यात यासाठी बैलांना सजविण्यात आले.नवरदेवासाठीच्या गाडीची सजावट घरीच विकास कामठे यांनी केली. बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरून गळ्यात घुंगऱ्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगरे लावण्यात आली. नवरदेव, मित्रमंडळी व इतर वऱ्हाड गाडीमध्ये बसवून लग्न सोहळ्यासाठी प्रस्थान सुरु केले.गावचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर, नाथशेठ बोरकर, बबन बोरकर, भारतनाना क्षीरसागर, चंद्रकांत बोरकर, अरूण बोरकर, भुजंग बोरकर, संजय न्हालवे, सदानंद बोरकर, नारायण गायकवाड , बाबुराव गायकवाड, मेघनाथ झेंडे, भगवान गोळे आदी ऊपस्थीत होते.