शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
2
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
3
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
4
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
5
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
6
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
7
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
8
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
9
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
10
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
11
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
12
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
13
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
14
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
15
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
16
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
17
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
18
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
19
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
20
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

“अद्याप गृहमंत्र्यांनी माफी मागितली नाही, पंतप्रधानांनी खोटे बोलू नये”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 4:56 PM

VBA Prakash Ambedkar News: पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

VBA Prakash Ambedkar News: धर्म आणि जात पुन्हा दिसू लागला आहे. सत्ताधारी पक्ष स्वतः विरोधातच आंदोलन करताना दिसत आहे. तुमचीच सत्ता आहे. दाखवण्यासाठी तुम्ही विरोधकांविरोधात आंदोलन करत आहात. सांगली येथे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझे सरळ मत असे आहे की, तो पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे. आम्ही आतापर्यंत अनेक पुतळ्यांची उद्घाटने केली आहेत. पण ते कधी पडले नाहीत. हा धातूचा पुतळा असून कसा पडला, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. जातिजनगणनाबाबत प्रश्न विचारला असता, निवडणुकीच्या तोंडावर ते विधान केले आहे. पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सरकारने खोटे बोलू नये. तुम्ही पंतप्रधान आहात. पंतप्रधानांना आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणे शोभत नाही. जातिजनगणना करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे तुम्ही बोलतात ते मान्य करायचे की, न्यायालयात सांगितले ते मान्य करायचे, अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होईल

ओबीसींसाठी दौरे करीत आहे. सर्व पक्ष ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत. ओबीसी आणि मराठामध्ये हा रोष पसरत चालला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरण बरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आली. जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभा पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

दरम्यान, महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या बाबतीत RSS आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. हिंसेची भाषा करणे म्हणजे समाजात तेढ निर्माण होत आहे. नितीन गडकरी यांच्या खात्यातील रिपार्ट आला आहे. त्याची चर्चा कुठे नाही. मनमोहनसिंग यांच्या काळातील चर्चा होते. गडकरी हे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्याची चर्चा होत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरsindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज