शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

भाजीपाल्याचे दर घसरले, भेंडी, कोबी ५ रुपये किलो

By admin | Published: August 31, 2016 5:43 AM

शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत.

नामदेव मोरे , नवी मुंबईशेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत. दोन महिन्यांत टोमॅटोचे दर १० पट तर भेंडीचे दर ८ पट कमी झाले आहेत. भाजीपाला विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत असतो. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी मार्चपासून कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतात. परंतु या वर्षी अचानक आॅगस्टमध्ये भाव कोसळले आहेत. राज्यातील बहुतांश सर्व होलसेल मार्केटमध्ये कांदा २ ते ८ रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी १ रुपया किलो दरानेही कांदा विकला जात आहे. कांद्यापाठोपाठ इतर भाज्यांचे भावही शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढू लागले आहेत. जूनमध्ये मुंबई एपीएमसीमध्ये भेंडी ४० ते ४४ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्य:स्थितीत हे दर ५ ते १२ रुपये झाले आहेत. १६ ते २० रुपयांचा कोबी ४ ते ६ रुपयांना विकला जात असून, टोमॅटो ४० रुपयांवरून ४ रुपये किलो झाले आहेत. राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये अशीच स्थिती आहे. कोल्हापूरमध्ये कोबी ३ ते ६ व टोमॅटो २ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. दोन महिन्यांत ८ ते १० पट भाव घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईमध्ये विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांना विक्रीतून उत्पादनासाठी लागलेला खर्चही मिळेनासा झालेला आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात पाव किलो भाजी घेण्यासाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत होते. परंतु आता शेतकऱ्यांना एक किलो भाजीसाठीही तेवढे पैसे मिळत नाहीत. १५ रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत नाही.