शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

विदर्भ चाळिशीच्या पुढेच

By admin | Published: April 11, 2016 3:03 AM

राज्यातील तापमानाचा पारा चढाच असून रविवारी विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतील कमाल तापमान चाळिशीच्या पुढेच होते. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

पुणे : राज्यातील तापमानाचा पारा चढाच असून रविवारी विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतील कमाल तापमान चाळिशीच्या पुढेच होते. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुढील तीन-चार दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यातही विदर्भात उष्णतेची लाट असून बहुतेक प्रमुख शहरांतील तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. मराठवाड्याची स्थितीही अशीच आहे. उस्मानाबाद, परभणी, नांदेड या शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे राहिले.मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील तापमानाने चाळिशी गाठली आहे. रविवारी मालेगाव येथे सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, जळगाव व पुण्यात लोहगाव येथील कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे गेले होते. वर्ध्याखालोखाल विदर्भातील अकोला, चंद्रपुर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या शहरांच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक हवामान कोरडे राहील. तर पुण्यात अंशत: ढगाळ वातावरण राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)