शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

VIDEO : ३० लाख पणत्या बनविणारे हात थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 12:21 PM

दिवाळीत सर्वात महत्वाच्या असणा-या मातीच्या पणत्यांऐवजी आता आकर्षित, रेखीव दिसणाºया ‘टेराकोटा’च्या पणत्यांना जास्त मागणी आहे.

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ -   हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा समजला जाणारा सण दिव्यांचा सण म्हणजे  दिपावली. या सणात मातीच्या पणत्यांच्या महत्वाचे स्थान असून कलात्मक बदलामुळे मात्र ते महत्व बाजारात विक्रीस आलेल्या ‘टेराकोटा’ पणत्यांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मातीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागणी नसल्याने जिल्हयात जवळपास ३० लाख पणत्याा बनविणाºया कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केले आहे. कुंभारच खुद्द आकर्षित, रेखीव दिसणा-या ‘टेराकोटा’च्या पणत्या खरेदी करुन विक्री करीत आहेत.
वाशिम शहरातील जवळपास ९५ टक्के कुंभारांनी दिवाळीसाठी लागणा-या पणत्या न बनिवता कलकत्ता येथील व्यापा-यांकडून ५०० ते ६०० रुपये हजाराने विकत घेवून त्याचीच ९०० ते १००० रुपये दराने विकून कमाई करीत आहेत. तर काही मोजके कुंभार पारंपारिक व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी काही कुंंभार मात्र आधुनिकतेशी लढाई करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे काही वर्षांनतर मातीच्या पणत्या नामशेष होणार असल्याचे चिन्ह आहे.  वाशिम शहरात ३० कुंभार असून दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मी मुर्त्या, खेळभांडी बनवितात.  दिपावलीसाठी काही मोजके कुंभार वगळता अनेकांनी पणत्या बनविणे बंद केले आहे. बाजारात गत ४ ते ५ वर्षापूर्वी मातीच्याच पणत्या विक्रीस यायच्यात.   टेराकोटाच्या पणत्या आल्याने  २५ कुंभारांचे पणत्या बनविणारे हात थांबले आहेत. एक कुंंभार ५० हजार पणत्या बनवून विकायचा आज २५ कुंभारांचे प्रत्येकी ५० हजार पणत्या बनविणे थांबल्याने  १२ लाख ५० हजार पणत्या व ग्रामीण भागातील १६ ते १७ लाख पणत्या बनविणारे कुंभारांचे हात थांबले आहेत.  तरी काही कुंभार पारंपारिक व्यवसायाला टिकवून आधुनिकतेशी लढाई करतांना दिसून येत आहे. दिपावलीत दिवा कोणताही असो, खरे महत्व असते ते प्रज्वलित केलेल्या ज्योतीचे एवढे मात्र नक्की!