शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

VIDEO- शेतीच्या मालासाठी शेतकऱ्यांचे वाहन ठरते गाढव!

By admin | Published: September 01, 2016 7:08 PM

शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकरी बैलबंडी, ट्रॅक्टर व अन्य साधनांचा वापर करतात.

गोवर्धन गावंडे/ऑनलाइन लोकमत

हिवरखेड, दि. 1 - शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकरी बैलबंडी, ट्रॅक्टर व अन्य साधनांचा वापर करतात. परंतु, हिवरखेड येथील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून शेतमाल आणण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून चांगला रस्ता नसल्यामुळे आजही शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी गाढवांचा उपयोग करावा लागतो.

हिवरखेड परिसरातील मुंजावार हा रस्ता पावसाळ्यामध्ये चार महिने चिखलयुक्त असतो. त्या रस्त्याने पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते न्यावे लागतात. तसेच पीक आल्यानंतर मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घरी आणण्यासाठी वा शेतात नेण्यासाठी मागील ५० वर्षांपासून गाढवाचा वाहन म्हणून उपयोग करावा लागतो. शेती रस्त्यावर बैलबंडी वा ट्रॅक्टरचा उपयोग होत नाही. या परिसरात १०० हेक्टर शेती असून, संबंधित शेतकऱ्यांना पेरणीपासून तर शेतमाल घरी आणण्यासाठी जून ते सप्टेंबरपर्यंत गाढवांचा उपयोग करावा लागतो.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरसुद्धा ही परिस्थिती बदलेली नाही. मागील कित्येक वर्षांपासून या परिसरातील शेतकऱ्यांना विविध कार्यालयाच्या चकरा मारून त्यांच्या हाती फक्त निराशा आली. तरी या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना वनवासातून मुक्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करूनसुद्धा त्याचा काहीच फायदा झालेला नाही. पाणी-पाऊस वाढल्यास शेतकऱ्यांचा शेतातील माल पावसात भिजतो व खराब होतो. त्याला त्याचा योग्य भाव मिळत नसल्याचे एकंदरित चित्र पहावयास मिळत आहे.