शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Vidhan Parishad Election: एकनाथ शिंदे, अजित पवारांचं शेवटच्या क्षणी मतदान; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:45 IST

सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले.

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले. आता या निवडणुकीच्या मतदानाला काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे मतदान शेवटच्या क्षणी करत आहेत. 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी हायकोर्टाने नाकारली. तर शिवसेनेचे अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे विधान परिषदेसाठी २८५ आमदार मतदान करू शकतात. सकाळी ९ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी प्रत्येक पक्षाने खबरदारी घेतली आहे. 

सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले. दुपारी १२ च्या सुमारास शिवसेनेच्या आमदारांनी मतदानाल सुरूवात केली. आतापर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. यानंतर आता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील मतदानाला गेले आहे. 

नवाब मलिक, अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टानेही परवानगी नाकारली हायकोर्टाने मलिक-देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर दोघांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दुपारी २ वाजता ही सुनावणी सुरू झाली. तेव्हा जर मतदानाची परवानगी दिली तर मतदान करू शकता का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या वकिलांना विचारणा केली. मात्र हायकोर्टाने उशीरा निकाल पत्र दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात येण्यास उशीरा झाला असं सांगण्यात आले. परंतु या प्रकरणावर तातडीने निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत मतदानाला परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली. 

मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल - रवी राणा महाविकास आघाडीची बिघाडी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मतांचे परिवर्तन भाजपाकडे झाले आहे. अपक्षांची मदत आणि काही मविआ आमदारांची साथ यामुळे भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून येईल. या निकालाचा परिणाम पाहून मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे