शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:02 IST

शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याचा धडका सुरू करण्यात आला आहे. यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात सर्वच पक्षांकडून उशीर करण्यात आला आहे. बंडखोरीवर उपाययोजना म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात दिरंगाई करण्यात आली आहे. मात्र जागा वाटप आणि नाराजांची यादी पाहता, विधानसभा निवडणुकीची सरळ लढत युती असताना देखील भाजप-शिवसेनेतच होण्याची शक्यता आहे. यामुळे दोघांच्या भांडणात आघाडीला यश मिळविण्याची संधी निर्माण होणार आहे.

2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेसह आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील स्वबळावर लढले होते. यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीला नकार देणारा शिवसेना पक्ष अखेरीस भाजपसोबत सत्तेत सामील झाला. राज्यात सत्तेत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली. त्यामुळे 2019 मध्ये विधानसभा निवडणूक देखील शिवसेना-भाजप स्वबळावर लढवणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. शिवसेनेचे काही नेते भाजपमध्ये गेले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मेगा भरतीच झाली.

युती होणार नाही, असा विचार करून भाजप आणि शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची आता पंचाईत झाली आहे. युती तुटल असंच या नेत्यांनी गृहीत धरले होते. मात्र ऐनवेळी सगळ उलट झाल्यामुळे सत्ताधारी पक्षातील नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ही नाराजी ऐन निवडणुकीत गुप्त पद्धतीने समोर येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उघड-उघड विरोध दर्शविण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यातील बंडाळी समोर आली आहे. तर पुण्यात देखील हेच होण्याची शक्यता आहे. सिल्लोड मतदार संघ युतीत 25 वर्षांपासून भाजपकडे होता. परंतु, जागा वाटपात हा मतदार संघ अब्दुल सत्तार यांच्यासाठी शिवसेनेला सोडण्यात आला. यामुळे येथील भाजपचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. तर काहींनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे सत्तार यांचा मार्ग खडतर झाला आहे.

दुसरीकडे गंगापूर मतदारसंघ शिवसेनेला हवा होता. परंतु, भाजपने या मतदार संघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज झाले असून विरोधकांसोबत मिळून बंब यांच्याविरुद्ध काम करायचे नियोजन काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे बंब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तसेच पुण्यात भाजपने शहरातील एकही मतदार संघ शिवसेनेला सोडला नाही. यावरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांकडून युती धर्म पाळला जाईल का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशीच स्थिती राज्यातील अनेक मतदारसंघात निर्माण झाली आहे. एकंदरीत शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे.