शहरं
Join us  
Trending Stories
1
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
2
"ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", मोदींचा घणाघात; राहुल गांधींना म्हटलं व्हायरस
3
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
4
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
5
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
6
Team India Batting, IND vs BAN 1st Test: "अरे बाबा, हात जोडतो... एकदा तरी नीट खेळ"; टीम इंडियाच्या 'या' फलंदाजावर नेटकरी नाराज
7
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
8
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
9
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
10
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
11
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
12
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
13
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
14
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
15
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
16
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
17
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
18
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
19
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
20
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल

"मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला तरच..."; पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यावर वडेट्टीवारांचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 5:49 PM

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

Vijay Wadettiwar on PM Modi Apology : मालवणच्या राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र एका वर्षाच्या आतच हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली आहे. मात्र निवडणुकांमुळे ही माफी मागितल्याचा संशय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्ल्यावरील २८ फुटी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं होतं. मात्र आठच महिन्यात पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आलीय. अशातच महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी एका कार्यक्रमात जाहीर माफी मागितली आहे. मात्र आता या माफीनाम्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्यानंतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान यांनी आज शिवप्रेमींची माफी मागितली. पण पुतळा कोसल्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला. ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार फरार आहे, कारवाई नाही. मंत्री केसरकर म्हणाले काही तरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला असेल. सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असताना पुतळा प्रकरणी बोटं नौदल कडे दाखवले! पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत! त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फक्त माफी मागितली का हा संशय येतोय," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा

"काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे