शहरं
Join us  
Trending Stories
1
Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी
2
Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी
3
Budget 2024 : स्टँडर्ड डिडक्शनची सूट मर्यादा वाढून १ लाख रुपये होणार का? २३ जुलैला मिळणार उत्तर
4
Rain Update : कालपासून राज्यात जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील 'या' भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार
5
'मी त्याच्यासारखी नाही...', दुसऱ्या घटस्फोटातून सावरणं कठीण; दलजीत कौरने व्यक्त केल्या भावना
6
अदानींविरोधात आंतरराष्ट्रीय कट! हिंडेनबर्गनं दोन महिन्यांपूर्वीच क्लायंटशी शेअर केलेला रिपोर्ट, मोठा गौप्यस्फोट
7
Chennai Petroleum Corporation Ltd: १ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या
8
कुलगाममध्ये कपाटात बंकर बनवून लपले होते चार दहशतवादी; धक्कादायक व्हिडीओ समोर
9
अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी
10
विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या रोमँटिक केमिस्ट्रीवर चाहते फिदा, नेटकरी म्हणाले, 'कतरिनाचा...'
11
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; TATA Motors मध्ये तेजी, टायटन कंपनीचे शेअर्स घसरले
13
पुण्यात मध्यरात्री कारच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी!
14
Income Tax Rule: तुमच्या मुलानं कमाई केली तर, कोण भरणार इन्कम टॅक्स? काय म्हणतो आयकर विभागाचा नियम, जाणून घ्या
15
खळबळजनक! शाळेतलं प्रेम, लव्ह मॅरेज... कपलने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?
16
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेला फटका; रुळांवर साचलं पाणी, रेल्वेसेवा ठप्प
17
मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
अपघातानंतर वडिलांना फोन, अन् नॉट रिचेबल; वरळी प्रकरणातील आरोपीची धक्कादायक माहिती समोर
19
आव्हानांवर मात करीत महाराष्ट्र ‘नंबर वन’; परकीय गुंतवणूक वाढल्याची उदय सामंतांची माहिती
20
पुण्याचे आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते

"सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय", लाडकी बहीण योजनेवरही विजय वडेट्टीवारांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:43 PM

Vijay Wadettiwar : शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूवन राज्य सरकारवर केली आहे.

मुंबई : शेतकऱ्यांचे ४६०० कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. आपत्तीग्रस्तांच्या नावाला १५ हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे, असा आरोप करत सरकारने लाडकी बहीण योजना जरी काढली असली, तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूवन राज्य सरकारवर केली आहे.

शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या ३५० डीपी चोरीला गेल्या आहेत. त्यावर सरकारचचे लक्ष नाही. शेतकऱ्यांचे ४६००० कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. आपत्तीग्रस्तांच्या नावाला १५ हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे. तसेच, बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावाने लाटल्या. सरकार केवळ आम्ही खोटे नेरेटिव्ह सेट केले बोलतात. आम्ही काय खोटे नेरेटिव्ह सेट केले, तुम्हीच खोटं बोललात, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

याचबरोबर, लाडकी बहीण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी खात्यातून मत विकत घेणं आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही? निवडणुकीच्या तोंडावरच का सुचली? यातून काही निष्पन्न होणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच, दिक्षाभूमी येथील आंदोलनाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही- विजय वडेट्टीवारविधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करेल का? असे विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमचे तीनही उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे. तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाFarmerशेतकरी