शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

जिल्ह्यातील विरोध मावळणार ? विनायक मेटेंचा मंत्रीपदाचा मार्ग होणार मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 13:07 IST

पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या घटलेल्या जागा आणि दिग्गज मंत्र्यांचे झालेले पराभव यामुळे मित्रपक्षांना पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेला मंत्रीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपकडून मेटेंना पाच वर्षे मंत्रीपदासाठी ताटकळत ठेवून शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावर त्यांची बोळवण करण्यात आली होती. एकाच जिल्ह्यात दोन मंत्रीपदे देण्यावरून भाजपमध्येच एकमत नसल्यामुळे ही स्थिती होती. परंतु, आता बीड जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी भाजपच्या चिन्हावर लढलेले मेटेंचे तीन समर्थक निवडून आले आहेत.

पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्यासंदर्भात काहीही हालचाली नाही. मंत्रीपदासाठी मुंडे यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांचा मंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे, विधान परिषद दिल्यानंतर मंत्रीपद नाही, असा नियमच भाजपमध्ये आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून निवडणूक लढवावी लागली आहे.

अशा स्थितीत पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.