शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

यादीतील घोळामुळे उमेदवारांसह मतदारही गोंधळात

By admin | Published: January 30, 2017 7:56 PM

प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 -  प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे. शहरातील लोकसंख्या उपनगरात स्थलांतरीत झाल्यामुळे त्यानुसार प्रभागांच्या सीमा रेषा बदलण्यात आल्या आहेत. यामुळे मतदार याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. याचा परिणाम मतदानावरही होणार असल्याने उमेदवार अस्वस्थ आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ही निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक प्रभागात ५० ते ६० हजार लोकसंख्या ठेवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. परंतु वरळी येथील प्रभाग क्र. १९४ मध्ये लोकसंख्या आणि मतदारांच्या आकडेवारीत गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. ५८ हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभागात ६१ हजार ८२५ मतदार नोंदविण्यात आले आहेत. हा घोळ प्रत्यक्ष महापालिकेच्या संकेतस्थळावरच दिसून येत असल्याची तक्रार म्हात्रे यांनी केली आहे. तसेच दहिसर येथील प्रभाग क्र. १ मध्ये लोकसंख्या ४९ हजार ९४० तर मतदार अवघे २४ हजार ७९३ नोंदविण्यात आले आहेत, असा गोंधळ अन्य प्रभागांमध्येही उडाला असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम संपूर्ण मतदान प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूकच रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. असे आहेत काही घोळ मतदाराचे नाव एका प्रभागात आणि मतदानाचा अधिकार दुसऱ्या प्रभागात अशा तक्रारी प्रामुख्याने पुढे आल्या आहेत. यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी आधी आपले नाव कुठल्या मतदार यादीत आहे याचा शोध घ्यावा लागेल. - प्रभाग क्रमांक १९२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर को.आॅप. सो. 1 ते 4, बोहरी चाळ, केसरी चाळ, दूधवाला चाळ क्र. 1 व 2, खापरी देव झोपडपट्टी संघ, दळवी नगर दादर स्थानक हे ठिकाणी मतदार यादीचा गोंधळ आहे. - शीतल म्हात्रे यांचा भाऊ हार्दिक म्हात्रे हा कॅनेडियन नागरिक आहे. मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या नावाने ओळखपत्र देण्यात आले आहे. घरच्या पत्त्यावर हे ओळखपत्र पाठविण्यात आले असून त्यात आडनावाचाही घोळ आहे. त्यांचे नाव म्हात्रेऐवजी मेहता असे यादीत आले आहे. - निवडणुकीत 50 टक्क्यांहून कमी मतदान होते. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती सुरू केली आहे. यासाठी मतदान केंद्र प्रत्येक एक किमीच्या अंतरावर असणार आहे. मात्र मतदार यादीतील गोंधळामुळे मतदारांची गैरसोय होऊन त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. - 4 फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीतील चूक सुधारता येईल. अंतिम मतदार यादी 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.