शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

आता लढा सामान्यांच्या हातात, दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार; मनोज जरांगेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 5:25 AM

आम्ही २८८ जागा लढणारच आहोत. आंबेडकरांचा सल्ला प्रत्येक वेळेस मानत आलो आहे. त्यांनी गरिबांच्या आणि गरजवंतांच्या बाजूने राहावे, एवढीच अपेक्षा आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार असल्याचा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.३१) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत केला. प्रवीण दरेकर यांनी काल रात्री मुंबईत बैठक घेतली. या बैठकांमधून मराठ्यांचे आंदोलन चिघळवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

जरांगे-पाटील म्हणाले की, माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मराठा आता कुठल्याही पक्षाला महत्त्व देत नाही, त्यांना पक्षात राहायची इच्छा राहिलेली नाही. आता लढा सामान्यांच्या हातात आहे. आता टेन्शन घेत नाही. आता लवकरच पर्दाफाश होणार आहे.  

मुदतवाढ निरर्थक

विद्यार्थ्यांना एसईबीसी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस हे तिन्ही आरक्षण ठेवावे. मुलींना मोफत शिक्षण द्यायचे असेल तर अटी, शर्ती रद्द करा. सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे. त्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानतो. मुदतवाढ देऊन काम होत नाही, त्यांना काम करायला लावा, नुसती मुदतवाढ देण्यात काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

गरजवंतांच्या बाजूने उभे राहावे

जरांगे-पाटील यांनी २८८ उमेदवार उभे करावेत, असे प्रकाश आंबेडकर बोलले होते. आम्ही २८८ जागा लढणारच आहोत. आंबेडकर यांचा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानत आलो आहे. त्यांना मराठा समाज मानतो, त्यांनी गरिबांच्या आणि गरजवंतांच्या बाजूने राहावे, एवढीच अपेक्षा आहे, असेही जरांगे-पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण