शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा

By admin | Published: June 05, 2017 5:11 AM

शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे

महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांचे सद्यस्थितीचे मनुष्यबळ पाहता, रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे. अनेक वर्षांपासून पदांच्या निर्मितीसह कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे प्रवासी सुरक्षा तुटपुंज्या रेल्वे पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे.शहरात सर्वात जास्त प्रवास लोकलने केला जातो. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीस (जीआरपी) तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे हद्दीतील गुन्हा उघडकीस आणणे, गन्हेगारांचा शोध घेणे, अपघातातील मृत व्यक्तींचा पंचनामा करणे, अशी मुख्य जबाबदारी रेल्वे पोलिसांवर असते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. १९८१ ते २०१४ या कालावधीत केवळ २३९ पोलीस अधिकारी आणि ३,७८० पोलीस कर्मचारी भरती झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. २००० साली ८७ अधिकारी व ७२३ कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. २०१४ साली रेल्वे पोलीस दलात १०० पोलिसांची भरती झाली होती. मात्र त्यानंतर, अद्यापपर्यंत रेल्वे पोलीस ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.रेल्वेच्या ३ हजार लोकल फेऱ्यांमधून दररोज ७७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी सुरक्षेसह कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान काही हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी करत आहे. सीएसटी ते कर्जत, कसारा आणि चर्चगेट ते बोर्डी रोड रेल्वे स्थानकांपर्यंतचा परिसर रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येतो. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जीआरपीला अधिकारी पदांसह ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.