शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

प्रभाग फेररचनेने वाढवले नगरसेवकांचे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 5:18 AM

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या प्रभाग फेररचनेत शहरातील सात प्रभाग कमी झाल्याची खबर लागताच नगरसेवक धास्तावले आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या प्रभाग फेररचनेत शहरातील सात प्रभाग कमी झाल्याची खबर लागताच नगरसेवक धास्तावले आहेत. एकीकडे आरक्षणात प्रभाग हातून निसटण्याची टंगती तलवार, आणि त्यातूनही वाचल्यास प्रभागांच्या फेररचनेचा फास अशा कैचीत सापडण्याची चिन्हे दिसल्याने नगरसेवकांची धावाधाव सुरू आहे. काही नगरसेवकांनी आपले राजकीय वजन वापरून प्रभागांच्या नवीन सीमारेषेचा अभ्यास सुरू केला आहे. तर काही दिग्गजांनी आपल्या प्रभागांसह आसपासच्या प्रभागांमध्येही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.२०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या उपनगरांकडे स्थलांतरित झाली. त्यामुळे लोकसंखेच्या आधारे प्रभागांची फेररचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या फेररचनेच्या पहिल्याच बदलाने शहरातील नगरसेवकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शहर भागातील नगरसेवकांची संख्या ६३ वरुन ५६ वर घसरली आहे. अन्य प्रभागांमध्ये विलीन करण्यात आल्याने प्रभागांचे आकारमानही वाढणार आहे. याचा फायदा उपनगरांना होणार आहे. शहरात सातजणांना घरी बसावे लागत असताना उपनगरांमध्ये इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र प्रभाग फेररचना आणि आरक्षण असे दुहेरी संकट अद्यापही नगरसेवकांवर घोंघावत आहे. त्यामुळे दिग्गजांनी आपला दावा कायम राहण्यासाठी विद्यमान व संभाव्य प्रभागात आपला निधी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. फेररचनेचा अंतिम मसुदा जाहीर होण्याआधीच अनेक बड्या नगरसेवकांनी आपल्या नविन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करून मतदारांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)प्रभाग रचनेतील बदलकुलाबा, पायधुनी, चंदनवाडी, ग्रँटरोड, भायखळा या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक तर प्रभादेवीमध्ये दोन प्रभाग कमी झाले आहेत. त्यामुळे शहरातील नगरसेवकांची संख्या घटली आहे.गोरेगाव, दहिसरमध्ये प्रत्येकी एक आणि मालाड, कांदिवलीत प्रत्येकी दोन प्रभाग वाढले आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरत नगरसेवक संख्या ९७ वरून १०२ इतकी झाली आहे.चेंबूर, घाटकोपरच्या हद्दीतील प्रत्येकी एक प्रभाग कमी झाला. तर कुर्ला, भांडुपमध्ये प्रत्येकी एक आणि मानखुर्दमध्ये दोन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांत प्रभागांची संख्या ६७ वरुन ६९ होणार आहे.