शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन

By admin | Published: August 24, 2014 1:09 AM

मावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो.

मोहन भोयर - तुमसरमावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हे छोटेसे गाव आहे बाळापूर. मानवनिर्मित टेकड्यांमुळे या गावात सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. तुमसर तालुका मुख्यालयापासून ३५ कि़मी. अंतरावर बाळापूर (हमेशा) नावाचे लहानसे गाव आहे. सातपुडा पर्वत रांगात वसलेल्या या गावात बाराही महिने सूर्याची किरणे सकाळी ९ वाजतानंतर दिसतात. या गावाजवळच मॅगनीजची खुली खाण आहे. ही खाण ब्रिटिशकालीन असून हा संपूर्ण परिसर नैसर्गिक खनिज संपत्तीने नटलेला आहे. १०२ वर्षे जुन्या असलेल्या या खाणीवर केंद्र शासनाची मालकी आहे. खाण खुली असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येते. रोज शेकडो टण भुसभुशीत माती आणि दगड बाहेर निघतात. ही माती आणि दगडाचे ढिगारे गावाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण बाजूला टाकले जात असल्याने महाकाय उंचच उंच टेकड्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे तिन्ही ऋतूत सकाळी ९ वाजेपर्यंत सूर्याची किरणे गावात पोहोचतच नाहीत. ब्लास्टिंग आणि डम्पिंगमुळे गावात नेहमी धूळ असते. ही धूळ नाकातोंडाद्वारे शरीरात जाते. परिणामी नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. अनेकांना क्षयरोगाने ग्रासले असून या परिसरातील पाण्यात क्षार असल्यामुळे अनेकांचे दात पिवळे पडले आहेत. त्यांना हाडाचे विकारही जडले आहेत.खाण क्षेत्र वाढलेया खाणीत सुमारे १ हजार २०० कामगार कार्यरत आहेत. खाणीचे निश्चित क्षेत्र किती हे अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. मॅगनीज दिसेल तिथे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे खाणीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. २०० वर्षे पुरेल इतके मॅगनीज भूगर्भात आहे. या परिसरात जस्ट्रोपा नावाची वनस्पती लावण्याचे निर्देश शासनाने मॉईलला दिले आहेत. जस्ट्रोपोमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते. परंतु, या परिसरात ही वनस्पती कुठेच दिसत नाही. अपघाताची प्रतीक्षागावाला भेट दिली असता मानवनिर्मित माती व दगडांची उंचच उंच दरड गावात प्रवेश करताच दिसून येते. ही दरड अत्यंत धोकादायक आहे. यामुळे संपूर्ण बाळापूर हे गाव गडप होण्याची भीती आहे. मॉईल प्रशासनाने येथे उपाययोजना केली नाही तर माळीणची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकऱ्यांचे पुनर्वसन नाहीमॉईल प्रशासनाने कामगारांचे अन्यत्र पुनर्वसन केले नाही. मॉईलच्या प्रदूषणामुळे शेती नापीक झाली आहे. रोजगारासाठी गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी शहराकडे धाव घेतली आहे. खाण मंत्रालयानेही दखल घेतलेली नाही. स्थानिक बेरोजगार तथा शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी न देता परप्रांतीयांनाच स्थान दिले आहे.