शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

टाटा धरणांतील पाण्यासाठी जलसत्याग्रह

By admin | Published: May 08, 2016 2:13 AM

टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील

लोणावळा : टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील नागरिकांनी वलवण धरणाच्या जलाशयात उतरून जलसत्याग्रह केला. यावेळी पत्रकारांना टाटा धरणापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आंदोलकांपैकी केवळ १० जणांना धरणावर जल सत्याग्रहासाठी सोडले. तेदेखील त्यांच्याकडील मोबाइल व कॅमेरे काढून घेण्यात आले होते. धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे, याची माहिती सर्वांना मिळू नये याकरिता ही दक्षता घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. टाटाचे मावळ व मुळशी परिसरातील वलवण, लोणावळा, शिरवता, सोमवडी, ठोकळवाडी व मुळशी या सहा धरणांमध्ये तब्बल ४८.९७ टी.एम.सी. एवढा पाणासाठा शिल्लक ठेवला आहे. हे पाणी भीमा खोऱ्यात वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांचे अडविलेले आहे. ते आमच्या हक्काचे असून, तातडीने दुष्काळग्रस्त नागरिकांना द्यावे. तसेच इंद्रायणी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. टाटाचा हा जलव्यवहार राज्यघटनेच्या कलम ३८ व ३९च्या विरोधात, तसेच जलनीती, जलसंपत्ती प्राधिकरण कायदा व जलविद्युत कायद्याविरोधात असल्याचे सांगत आंदोलकांनी टाटाच्या अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिली. (वार्ताहर)