शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

निवडणुकांसाठी अधिवेशनावर पाणी

By admin | Published: March 11, 2017 12:55 AM

जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापतींच्या निवडीची राजकीय खलबते करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तीन दिवसांचे कामकाज

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापतींच्या निवडीची राजकीय खलबते करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तीन दिवसांचे कामकाज रद्द करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज समितीने हा निर्णय घेतला आहे. १४ मार्च रोजी २५ जिल्ह्यांतील पंचायत समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत. ११ व १२ मार्च शनिवार, रविवारची सुटी तर १३ मार्च मंगळवारी धुलिवंदनाची सुटी आली आहे. त्याला जोडून आता १४ मार्च रोजी पंचायत समितच्या सभापतीपदांची मोट बांधता यावी म्हणून अधिवेशनाला सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात १५ ते १८ असे चारच दिवस कामकाज होणार आहे.२१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. १९ मार्चला अधिवेशनाला रविवारची सुटी आहे. मात्र सोमवारी २० मार्च रोजी फक्त एक दिवसासाठी अधिवेशनाला यायचे आणि पुन्हा २१ मार्चला मंगळवारी निवडणुकीसाठी परत जायचे यापेक्षा २० आणि २१ मार्च दोन्ही दिवस अधिवेशनच नको असा सूर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लावला. परिणामी तिसऱ्या आठवड्यात २२ ते २४ असे तीनच दिवस कामकाज होईल. अधिवेशनाचा पहिल्या आठवड्यात भाजपा पुरस्कृत आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरुन आणि कर्जमाफीच्या मागणीवरुन दोन्ही सभागृह चालले नाहीत. विधानसभेत फक्त एकच दिवस कामकाज झाले. २८ मार्च रोजी मंगळवारी गुडीपाडव्याची सुट्टी आहे. मग सोमवारी २७ मार्च रोजी एकच दिवस कशाला अधिवेशन करायचे म्हणून त्यादिवशी सुटी दिली गेली आहे. अधिवेशनाच्या पाचव्या आठवड्यात मंगळवारी ४ एप्रिल रोजी रामनवमीची सुटी आल्याने सोमवारी ३ एप्रिल रोजी अधिवेशनाला सुटी देण्यात आली आहे. यावर बोलताना, विरोधकांकडेच विषय नसल्यामुळे आणि बोलण्यासारखे काहीच शिल्लक नाही म्हणून अधिवेशनात गोंधळ घालण्याचे काम ते करत आहेत, असा आरोप संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी केला आहे.