शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पाणीकपातीचे संकट टळणार

By admin | Published: July 22, 2016 1:29 AM

पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडवरील पाणीकपातीचे संकट टळणार आहे.

पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडवरील पाणीकपातीचे संकट टळणार आहे. पंधरा दिवसांत आढावा घेऊन पाणीकपात मागे घेण्याविषयी निर्णय होणार असल्याचे जलसंपदा आणि महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यात आढावा बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सुरुवातीला दिवसातून एकदा, त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. जूनअखेरपर्यंत पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ परिसरात संततधार सुरू झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. १० टक्क्यांवर पोहोचलेल्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर सलगपणे संततधार सुरू होती. सर्वत्र नदी-नाल्यांना पाणी आल्याने पवना धरणातून पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंदही केले होते. मावळात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आजअखेर धरणाचा साठा ५४.३४ टक्के झाला आहे. एक जूनपासून धरणक्षेत्रात १०७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर २४ तासांत धरणक्षेत्रात १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० दिवसांत ४४.३४ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. चोवीस तासांत ०.७७ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी आॅगस्टअखेर ८० टक्के पाणीसाठागेल्या पावसाचे प्रमाण कमी होते. आॅगस्टअखेर धरणात पाणीसाठा ८० टक्के होता. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मावळात संततधार सुरूच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तविला आहे.