शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

बाराबंगला वसाहतीत पाण्याची बोंब

By admin | Published: July 13, 2017 4:24 AM

शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यासारख्या बड्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या बाराबंगला परिसरातील शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाण्याची नवी जोडणी हवी असेल, तर या गोरगरिबांकडे बांधकाम विभागाचे कर्मचारी आठ ते दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत आहेत. ठाणे पूर्व येथील बाराबंगल्यातील शासकीय वसाहतीमधील ‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात असलेल्या शासकीय वसाहतीत राहणारा नोकरवर्ग गेला एक महिना पाण्यासाठी वणवण फिरत आहे. तातडीने पाणी हवे असल्यास पाइपलाइनसाठी आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्याने येथील रहिवाशांना सांगितले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बारा बंगला या शासकीय वसाहतीच्या आऊट हाऊसमध्ये २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तक्रार केल्यास नोकरीवर गंडांतर येण्याच्या भीतीने काही गप्प बसतात.‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात २५ वर्षांहून अधिक काळ चार कुटुंबे राहतात. एक महिन्यापासून त्यांच्या घरात पाणी नाही. इथूनतिथून जाऊन पाणी आणावे लागते. पाणी भरूनभरून हाडे दुखायला लागली आहेत, असे या महिलांनी सांगितले. पाणी भरताभरता तर एका रहिवाशाला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, काही बंगल्यांतील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी दाबाने तेही केवळ अर्धा तासच पाणी येत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. गांगुर्डे यांनी सांगितले की, मी स्वत: बाराबंगल्यात राहतो. पाण्याची कोणतीही समस्या तेथे नाही. पाण्यासंदर्भात कोणत्याही तक्रारी माझ्याकडे तरी आलेल्या नाहीत. संबंधित कर्मचाऱ्याने पाण्याच्या व्यवस्थेसाठी ‘इंद्रायणी’ बंगल्यातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांकडून पैसे मागितले असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता मी याविषयी माहिती घेऊन बोलतो, असे सांगितले. >शासकीय बंगल्यांच्या आवारातच अव्यवस्थाशासकीय निवासस्थान म्हणून बाराबंगला परिसर ओळखला जातो. येथे अनेक शासकीय अधिकारी राहतात. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था बंगल्याच्या आवारातच करण्यात आलेली आहे. येथील बंगल्यात मुबलक पाणीपुरवठा होत असताना या कर्मचाऱ्यांच्या जीर्ण वसाहतींमध्ये पाण्याची बोंब आहे. याचबरोबर २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.