शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

दावडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Published: April 06, 2017 12:47 AM

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

दावडी : भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना पाणी मिळत नाही. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणातून दोन दिवसांत पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा चासकमान डावा कालवा फोडून नदीपात्रात पाणी सोडणार, असा इशारा देत शेतकऱ्यांनी चासकमान प्रकल्पाधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ केले.तालुक्याच्या पूर्वभागात भीमा नदीपात्रात होलेवाडी, खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव येथे छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहे. या बंधाऱ्याला मोठ्याप्रमाणात गळती आहे. दररोज लाखो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. त्यातच उन्हाचा तडाखा, तसेच सतत उन्हाळी पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने खालवत आहे. मांजरेवाडी (पिंपळ), शिरोली, मलघेवाडी सातकरस्थळ येथून जाणारी भीमा नदी कोरडी पडली आहे. येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी चासकमान धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडा, अशी मागणी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे. नदीपात्रात पाणीच नसल्यामुळे पात्रालगत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठावरील गावातील शेतकरी भीमा नदीत पाणी सोडा, अशी गावा-गावांतील मागणी शेतकरी करत असताना प्रशासन सुस्त असल्याने आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून ‘ठिय्या आंदोलन’ केले. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळ शिरोलीचे माजी सरपंच रवी सावंत, संतोष सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष विलास मांजरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख बाळासाहेब मांजरे, मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, माजी सरपंच काळुराम मांजरे, मनोहर मांजरे, विलास मांजरे, बाबूराव मांजरे, सुनील मांजरे, काळुराम मांजरे, लक्ष्मण मांजरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)>दोन दिवसांत चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी न सोडल्यास व शेतकऱ्यांना पाण्यासाठी वेठीस धरल्यास चासकमान धरणाचा वाहणारा डावा कालवा जेसीब यंत्राने फोडू व नदीपात्रात पाणी आणू, असा इशारा शेतकऱ्यांनी आक्रमक होत दिला. दरम्यान, शाखा आभियंता बी. आर. खेडकर यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.