शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
2
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
3
"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"
4
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
5
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
6
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
7
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 
8
सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!
9
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
11
मालाडमध्ये रिक्षाचालकांकडून मनसे कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या; राज ठाकरेंनी घरी जाऊन केलं सांत्वन
12
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
13
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
14
"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
15
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
16
Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?
17
बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी
18
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
19
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?

पाणीटंचाईतही सेनेचे मावळे झिंगले

By admin | Published: June 27, 2014 2:19 AM

अंबरनाथ पूर्व भाग पाणीटंचाईग्रस्त झाला असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत सैनिक झिंगले.

अंबरनाथ : चिखलोली धरण पूर्णत: आटल्याने अंबरनाथ पूर्व भाग हा पाणीटंचाईग्रस्त झाला आहे. तर अंबरनाथच्या या संकटाची जाणीव सर्वाना असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत बुधवारी  १५ हजारांहून अधिक मावळे व्यस्त होते. 
शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणा:या चिखलोली धरणातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. याची कल्पना अंबरनाथच्या सत्ताधारी शिवसैनिकांना आहे. असे असूनही शहरातील शांतीसागर रिसॉर्टमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. निमित्त होते कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीला मिळालेल्या यशाचे. या यशासाठी कार्यकत्र्यानी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांच्यासाठी खास ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती.
 विशेष म्हणजे या पार्टीत महिलांना बोलाविण्यात आले नव्हते. या पार्टीसाठी कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील 5 हजार कार्यकत्र्याना निमंत्रित करण्यात आले. मात्र ओली पार्टी म्हटल्यावर काम करणारे मावळे आणि न करणारे कावळेही हजर राहिले. त्यामुळे 5 हजारांचा आकडा 15 हजारांवर गेला. नियोजनापेक्षा कार्यकर्ते तिप्पट झाल्याने जेवणाची आणि मदिरेची बोंबाबोंब झाली. ज्यांना मिळाली त्यांनी ती तिथे तर ढोसलीच शिवाय रिकाम्या बाटलीत पेग भरून घरीही नेली. जेवणासाठी कार्यकत्र्याची तुफान गर्दी झाली होती. 
काहींनी तर उपाशीच घरी येणे पसंत केले. त्यातही काही कार्यकत्र्याचा उत्साह एवढा दांडगा होता की, ते दारूसाठी व जेवणासाठी नवा स्टॉक येईर्पयत थांबले होते. अख्खी शिवसेना त्या पार्टीत सामील झाली होती. नागरिकांच्या हिताच्या मुद्दय़ावर राजकारण करणा:या शिवसेनेला आणि त्यांच्या पदाधिका:यांना अंबरनाथकरांची तहान दिसली नाही. 
या पार्टीला आणि सत्कार समारंभाला शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह अनेक बडे पदाधिकारी उपस्थित होते.