शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

१६ हजार गावांमध्ये पाणीटंचाई

By admin | Published: February 25, 2016 12:35 AM

सलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत

- राहुल कलाल,  पुणेसलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील २८५ तालुक्यांमधील १५ हजार ९६० गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी १ ते ४ मीटरपेक्षा जास्तने खालावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सन २०१४ मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. गेल्यावर्षी २०१५ मध्ये चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र त्यावर पाणी फिरले आणि राज्यात दुष्काळ जाहीर करावा लागला. पाऊस न पडल्याने राज्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने घटली आहे. आता उन्हाळा येऊ घातल्याने आणि पुरेसा पाणीसाठा नसल्याने भूगर्भातील पाणी हाच प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. भूगर्भातील पाणी एक मीटरपेक्षा खाली गेले तरी तेथील भूजल संपण्याच्या मार्गावर पोहोचले, असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे या सर्व गावांना उन्हाळ्यात भूगर्भातून पाणी मिळणार नसल्याचे भूजल विभागाने स्पष्ट केले आहे. या जिल्ह्यांंमधील स्थिती गंभीर या सर्वेक्षणात अहमदगनर, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा आणि सातारा या जिल्ह्यांतील भूजल पातळीची स्थिती गंभीर असल्याचे नोंदविण्यात आले आहे.राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यातील भूजल पातळीतील घटघटगावे ३ मीटरपेक्षा जास्त घट४,८२८२ ते ३ मीटरपेक्षा जास्त घट३,९५३१ ते २ मीटरपेक्षा जास्त घट७,१७९एकूण१५,९६०